शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

By विश्वास पाटील | Updated: April 22, 2024 16:54 IST

जयवंतराव आवळे परजिल्ह्यांतून निवडून येणारे एकमेव खासदार 

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत आतापर्यंत झालेल्या १७ निवडणुकांत आमदार झाल्यानंतर खासदार होण्याचे भाग्य चौघांना लाभले. त्यामध्ये उदयसिंहराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि राजू शेट्टी यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार होऊन लातूर राखीव मतदारसंघातून खासदार होण्याची संधी माजी खासदार जयवंतराव आवळे यांना मिळाली. परजिल्ह्यांतून निवडून येणारे ते तसे एकमेव खासदार आहेत. उदयसिंहराव गायकवाड हे १९७२ ला शाहूवाडी मतदारसंघातून नवकाँग्रेसमधून आमदार होते. त्या निवडणुकीत त्यांना एकूण मते ३६ हजार ९५३ पडली; परंतु त्यातील त्यांचे मताधिक्य होते; तब्बल २४ हजार ७०९. त्याच वर्षी सदाशिवराव मंडलिक कागलमधून अपक्ष म्हणून पहिल्यांदा १६२४ मतांनी आमदार झाले. गायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८० च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४ च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून विधानसभेला निवडून आले.

आमदार झाले; परंतु लोकसभा नाही..विधानसभा लढवली त्यात यश मिळाले, आमदार म्हणूनही कारकिर्द गाजवली. उत्तम प्रतिमा, चांगले चारित्र्य असे सगळे पाठीशी असतानाही लोकसभेला मात्र त्यांना गुलाल मिळाला नाही, असेही काहीच्या बाबतीत घडले. त्यामध्ये शेका पक्षाचे चारित्र्यवान आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस, प्रा. एन. डी. पाटील, म्हसव्याचे काकासाहेब देसाई, जनता दलाचे लढाऊ नेते शंकर धोंडी पाटील, श्रीपतराव शिंदे, गोविंदराव कलिकते, के. एल. मलाबादे, अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, विक्रमसिंह घाटगे, संपतराव पवार यांचा समावेश होतो.

खासदार झाले; परंतु विधानसभा नाहीखासदार झाले; परंतु ज्यांना विधानसभेला लोकांनी निवडून दिले नाही, असेही काहींच्या बाबतीत घडले. त्यामध्ये एस. के. डिगे हे अगोदर करवीरमधून विधानसभेला पराभूत झाले आणि पुढच्याच १९५७ च्या निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून खासदार झाले. खासदार संजय मंडलिक यांनी २००९ ला कागल मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याच निवडणुकीत धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली; परंतु त्यांना यश मिळाले नाही. पुढे महाडिक २०१४ ला, तर मंडलिक २०१९ ला खासदार झाले. आता महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत; तर मंडलिक नव्याने लोकसभेच्या रिंगणात आहेत.

दोन्हींकडे गुलाल नाहीराजकीय क्षेत्रात काम केले, समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला; परंतु तरीही जनतेने विधानसभा व लोकसभेलाही गुलाल लावला नाही, असेही अनेकांच्या बाबतीत घडले. त्यामध्ये ‘शेतकरी कामगार पक्षाची मुलुखमैदान तोफ’ अशी प्रतिमा असलेले प्रा. विष्णुपंत इंगवले, विजय देवणे, शिवसेनेचे पुंडलिक जाधव यांचा समावेश होतो.

राजू शेट्टी २००४ मध्ये झाले आमदारगायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८०च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून आमदार झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४