शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूर परिक्षेत्रात दोन वर्षांत ५९५ गुंडांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:16 IST

गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देसंघटित गुन्हेगारी काढली मोडून गुंडांच्या ८२ टोळ्या गारद; पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवला दबदबा

तानाजी पोवारकोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.

अवघ्या दोन वर्षांतच ८२ टोळ्यांतील ५९५ गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करत त्यांना गजाआड डांबले. त्यामुळे परिक्षेत्रातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा बसला, पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गुन्हेगार डोके वर काढू लागले आहेत, त्यांना पुन्हा ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यामध्ये पाचही पोलीस अधीक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावत गुन्हेगारी विश्वावर वचक ठेवला. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांचेही मोठे योगदान लाभले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १६ टोळ्यांतील १४५ जणांवर तर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणमधील ३५ टोळ्यांतील २४० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. ही दोन वर्षे परिक्षेत्रातील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरली. गेल्या चार-पाच महिन्यांत कोरोना संकटामुळे मात्र नव्या टोळ्यांवर कारवाई करण्यास पोलीस खात्याला वेळच मिळाला नाही.कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे अधीक्षक डॉ. सोहेल शर्मा, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साताराचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारांवर चांगलाचा जरब ठेवला. त्यांच्या बदल्यांच्या तोंडावर गेले वर्षभर शांत राहिलेले गुन्हेगार आता पुन्हा आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नांत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ हे वर्ष गुंडांसाठी ठरले कर्दनकाळकोल्हापूर जिल्ह्यात २०१९ मध्ये १३ टोळ्यातील १२७ गुंडांच्या मुसक्या आवळल्या. इचलकरंजीतील तेलनाडे बंधूवर दुसऱ्यांदा मोक्कांतर्गत कारवाई केली, पण ते बंधू अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. अनेक पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहीत असल्याची चर्चा आहे, पण खाल्या मिठाला जागल्याप्रमाणे काहीजण गुपचूप आपली भूमिका बजावत असल्याचेही समजते.

शिवाय २०२० मध्ये जानेवारी महिन्यात राजस्थानच्या बिष्णोई गुंडांच्या टोळीचा थरारक पाठलाग करुन त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यानजीक पकडले. त्यावेळी पोलीस व गुंडांच्यात गोळीबारही झाला. त्या टोळीतील तिघांवर मोकांतर्गत करवाई केली.जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारीचा मोका कारवाईचा आलेख:जिल्हा :  टोळी संख्या - आरोपींची संख्या१) कोल्हापूर :  १६     - १४५२) सांगली :     १०     - ७३३) सातारा :     १४     - ८८४) सोलापूर ग्रामीण : ७ - ४९५ ) पुणे ग्रामीण : ३५ - २४०एकूण : ८२ - ५९५कोल्हापूर जिल्हयात गेल्या पाच वर्षांतील मोक्का कारवाईवर्षे : टोळी - आरोपी संख्या

  • २०१५ : ० १ - ०४
  • २०१६ : ० ३ - ३०
  • २०१७ : ० ३ - १४
  • २०१८ : १८ - ११५
  • २०१९ : १३ - १२७
  • २०२० : ० ३ - १८ (ऑगष्ट अखेर)
टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर