शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोल्हापूरच्या जंगलात लवकरच येणार चंद्रपूरवरून दोन वाघ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:28 IST

आदित्य वेल्हाळ  कोल्हापूर : चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र ...

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वनविभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखणी केली जात आहे. हे वाघ ही कोल्हापूरचीही प्राणी संपत्ती ठरू शकणार असल्याने लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.पश्चिम घाटाच्या वैभवसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या व त्यातील समृद्ध जंगलांचा काही भाग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि याच जंगलात आता अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग असणारा वाघ विसावणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून २००७ ला घोषित झाल्यानंतर या जंगलातील वाघांचा सूक्ष्म अभ्यास राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत (नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी) व वनविभागामार्फत केला गेला.कर्नाटकातील भीमगड वाइल्डलाइफ सेंच्युरी, गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य व महाराष्ट्रातील तिल्लारी, राधानगरी, आंबा, चांदोली, महाबळेश्वर, कोयना हा कॉरिडॉर वाघांचा मुख्य भ्रमण मार्ग आहे. येथूनच वाघांचे स्थलांतर होत असते; पण ते या जंगलात आपली हद्द तयार करून येथे राहत नसत हे अभ्यासानंतर लक्षात आले.

चार वर्षांपूर्वी प्राधिकरणाच्या अभ्यासकांनी या जंगलांचा सखोल अभ्यास करून कुरण विकास, पाणवठे वाढ, तृणभक्षक प्राण्यांची पैदास वाढ असे कार्यक्रम सुरू केले. उपवनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चितळांची पैदास करण्यात दोन वर्षे वनविभागाने जे विशेष कष्ट घेतले त्यामध्ये त्यांना यश आले. त्याचेच फलित म्हणून सतत स्थलांतर करणारे वाघ आता या जंगलात राहत आहेत, हे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून लक्षात आले आहे.डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोल्हापुरातील जंगलात एक नर वाघ मुक्कामास असणे ही चांगली व महत्त्वाची घटना असून प्राधिकरणाने चंद्रपूरच्या जंगलातून चार वाघ आपल्या जिल्ह्यातील जंगलात सोडणार असल्याचे दोन वर्षांपूर्वी घोषित केले होते. आता या वाघांना येथे सोडण्याची योग्य परिस्थिती निदर्शनात आल्याने लवकरच चार वाघांपैकी दोन वाघ हे या जंगलात आणणार असल्याचे समजते. ते कोठे व कधी आणणार, याची प्राधिकरण व वनविभाग कमालीची गुप्तता पाळत आहे.या वाघांच्या येण्याने जिल्ह्यातील जंगले ही अधिक समृद्ध तर होणारच आहेत; पण त्या वाघांची पुढची पिढी येथे जन्माला यावी व त्यांची डरकाळी आपल्या जंगलात पुन्हा ऐकू यावी, यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर.
  • वाघांसाठी बनवलेल्या विशेष गाडीतून प्रवास
  • विशेष नियंत्रित वातावरणाची गाडीत रचना
  • गाडी सुरू असताना वाघांवर नजर ठेवण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय.
  • सकाळी सहा ते बारा व सायंकाळी चार ते नऊ याच वेळात वाघांचे गाडीतून स्थलांतर
  • रेडिओ कॉलरमार्फत या वाघांवर दोन महिने लक्ष ठेवण्यात येणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघforest departmentवनविभाग