शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

महामार्ग ओलांडणाऱ्या दोन वानरांचा मृत्यू

By admin | Updated: January 12, 2016 00:33 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंला मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे दररोज पाळीव प्राणी, श्वान, वानर आदी प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण आहे

कऱ्हाड : महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील नांदलापूर बसस्टॉपसमोर महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा वानरांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन वानरांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य चार वानरे गंभीर जखमी झाली.एकाच वेळी सहा वानरांना ठोकरून निर्दयी वाहनचालक न थांबता निघून गेला. महामार्ग सुरक्षा रुग्णवाहिकेतून जखमी वानरांना उपचारासाठी नेण्यात आले. उपस्थित नागरिकांनी मृत वानरांवर अंत्यसंस्कार केले. येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनांनी ठोकरून मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरे व वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याचा विचार वेळेवरच होणे आवश्यक झाले आहे. कारण या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंला मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे दररोज पाळीव प्राणी, श्वान, वानर आदी प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची खरी गरज आहे. असे असतानाच रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आशियायी महामार्गावर नांदलापूर स्टॉपसमोरून सहा वानरे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.यावेळी कोल्हापूरकडून कऱ्हाडकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने या वानरांना जोरदार धडक दिली. यात दोन वानरांचा मृत्यू झाला. तर चार वानरे गंभीर जखमी झाली. महामार्ग सुरक्षा कंपनीच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सर्व जखमी वानरांना उपचारासाठी नेण्यात आले.यावेळी राजयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी, अमृत पटेल, नितीन पटेल, राजेंद्र कुंभार, जगन्नाथ पाटील व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)