शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशात दोन लाख टन दूध पावडर पडून : राज्यात रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:20 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महाराष्टÑात गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला असून, रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधाची पावडर करण्याशिवाय पर्याय नसला तरी देशातंर्गत व आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. देशात दोन लाख तर राज्यात ३० हजार टन ...

ठळक मुद्देदुग्ध व्यवसाय कोलमडला

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महाराष्टÑात गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला असून, रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधाची पावडर करण्याशिवाय पर्याय नसला तरी देशातंर्गत व आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. देशात दोन लाख तर राज्यात ३० हजार टन दूध पावडर गोडावूनमध्ये पडून राहिल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.राज्यात गाय व म्हैस दुधाच्या उत्पादनात वाढ झाली असून सध्या सुमारे दीड कोटी लिटर उत्पादन आहे. त्यातील एक कोटी लिटर दूध केवळ गायीचे आहे. कोल्हापूर, सांगली, जळगाव जिल्हा वगळता इतर ठिकाणी गायीच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.संकलन होणाऱ्या दुधापैकी सरासरी एक कोटी लिटर लिक्विड (पाऊच)मध्ये विक्री केली जाते. उर्वरित जवळपास ५० लाख लिटर दुधाची पावडर करावी लागते. हीच परिस्थिती संपूर्ण देशात आहे. मे २०१७ पासून पावडरच्या दरात घसरण सुरू आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर १२० रुपये किलोपर्यंत खाली आल्याने दूध उत्पादक संघ अडचणीत आले.राज्य सरकारने गाय व म्हैस दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला पण संघांना फटका बसू लागल्याने दोन महिन्यांत दरकपात करावी लागली.पावडरचे दर घसरत गेल्याने मध्यंतरी संघांनी गायीचे दूध स्वीकारणे बंद केल्याने उत्पादक हवालदिल झाले. त्यानंतर दर कमी करून दूध घेतले तरी अजूनही हा व्यवसाय तोट्यात आहे. बहुतांशी संघ गायीचे दूध (३.५ फॅट) सरासरी २२ रुपये लिटरने खरेदी करतात.गेले वर्षभर अस्थिर बाजारपेठेने दूध संघांचा कोटींचा तोटा झाला आहे. सहा-सात वर्षांपूर्वी असेच संकट आले होते, त्यावेळी ‘युपीए’ सरकारने पावडर किमतीच्या ७ टक्के निर्यात अनुदान दिले होते. त्याचा संघांना फायदा झाला होता. सध्या १० टक्के अनुदान देण्याची मागणी संघाकडून होत आहे.गोरगरिबांचा व्यवसाय उद्ध्वस्त होईलजगात अतिरिक्त दुधाचे संकट आहे, पण तेथील सरकार पावडरला थेट अनुदान देते. येथे इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा सरकारकडे पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने भाजप सरकार गांभीर्याने बघत नाही. आणखी काही महिने अशीच परिस्थिती राहिली तर गोरगरिबांचा व्यवसाय उद्ध्वस्त होईल, अशी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी खंत व्यक्त केली.