शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

दोन लाख शेतकरी ‘प्रधानमंत्री सन्मान’च्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:49 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सन्मान’ योजनेच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात दोन लाख ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री सन्मान’ योजनेच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात दोन लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना दोन हजारांचा पहिला हप्ताही मिळाला नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. आतापर्यंत दोन लाख १६ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता, तर केवळ ८६ हजार शेतकºयांना दोन्ही हप्ते प्राप्त झालेले आहेत. निकषाप्रमाणे सप्टेंबरअखेर दोन हप्ते देय लागतात.केंद्र सरकारने देशातील शेतकºयांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान’ योजना फेबु्रवारी २०१९ मध्ये जाहीर केली. सरकारी नोकरदार व सरकारी पेन्शनधारकांना योजनेचा लाभ होणार नाही. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम देऊन जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी, तालुका स्तरावर प्रांताधिकारी, गावस्तरावर तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. पात्र शेतकºयांना चार महिन्याला दोन हजार रुपये असे चार हप्त्यांत सहा हजार रुपये शेतकºयांच्या खात्यावर केंद्र सरकार वर्ग करणार आहे. या योजनेसाठी फेबु्रवारी महिन्यात शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्णात चार लाख ७६ हजार खातेदार शेतकºयांनी ‘प्रधानमंत्री सन्मान’ योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन लाख ९० हजार शेतकरी पात्र ठरले. उर्वरित शेतकºयांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते अपात्र ठरविण्यात आले. फेबु्रवारी ते मे या चार महिन्यांत दोन हजारांचा पहिला हप्ता, तर सप्टेंबरअखेर दुसरा हप्ता शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते.आतापर्यंत दोन लाख १६ हजार शेतकºयांना पहिला हप्ता मिळाला आहे, तर ८६ हजार शेतकºयांच्या खात्यावर दोन्ही हप्ते (चार हजार) जमा झाले आहेत.सप्टेंबरअखेर सर्व शेतकºयांना लाभ?लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने ही लोकप्रिय घोषणा करून घाईगडबडीने थोड्या शेतकºयांच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग केला; पण त्यानंतर पैसे येण्याचा वेग मंदावला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे सप्टेंबरअखेर सर्वच शेतकºयांच्या खात्यावर दोन्ही हप्ते जमा करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर गतिमान झाल्या आहेत.