शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

महापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:18 AM

कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देमहापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छताआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची माहिती

कोल्हापूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.महानगरपालिकेच्या कोणत्याही मोहिमेवर लोकांचा विश्वास बसायचा असेल आणि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आधी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यात भाग घेऊन मोहीम राबविली पाहिजे. म्हणूनच शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आधी स्वत:पासून करायला हवी. याकरिता १५ दिवसांतून एकदा दैनंदिन कामातील फक्त दोन तास स्वत:चे कार्यालय व त्याच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे.

मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय,अग्निशामक स्थानक, रुग्णालये, कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करायची आहे, असे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता कधी केली आणि पुढे कोणत्या दिवशी करायची आहे, याचे रेकॉर्ड संबंधित विभागाने ठेवायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.दैनंदिन कचरा उठाव करताना कचऱ्यांचे वर्गीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे, अधिकाºयांनी सतत दक्ष राहून काम करावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, सोसायटी, गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करावे, अशा सूचनासुद्धा आयुक्त कलशेट्टी यांनी केल्या.शहरात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करावी. ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या तयार केल्या जातात, त्याच ठिकाणी प्रथम कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.‘स्वच्छता अ‍ॅप’चा प्रसार करावास्वच्छ भारत अभियान’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ला शहर परिसरातील १८ हजार नागरिक जोडले गेले आहेत; परंतु ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिक या अ‍ॅपशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त तक्रारी या अ‍ॅपवर याव्यात याकडे लक्ष द्या, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सुचविले. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर