शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दोन रुग्णालये ‘जीवनदायी’तून बाहेर

By admin | Updated: May 22, 2016 00:45 IST

मनमानी कारभार भोवला : आरोग्य योजना समितीचा ‘निरामय’,‘रामकृष्ण’ यांना झटका

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरराज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’त समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्णालयांचे मुंबई येथील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या समितीने निलंबन केले. त्यामुळे या रुग्णालयाला येथून पुढे या योजनेतील कोणतीही प्रक्रिया राबविता येणार नाही. घोटवडे (ता. राधानगरी) येथील ‘रामकृष्ण’ हॉस्पिटल व इचलकरंजी येथील ‘निरामय’ या रुग्णालयांचा निलंबनामध्ये समावेश आहे. या योजनेतील करार व अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर समितीने ही कारवाई १७ मे २०१६ रोजी केली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची कारवाई केली आहे.याबाबत जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांनी दिलेली माहिती अशी की, राज्यातील तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने राज्यात जुलै २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह उर्वरित जिल्ह्णात २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. गरिबांना मोफत उपचार मिळावेत, हा या योजनेमागील उद्देश होता. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हेर्ले, वडगाव, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये दोन, महागाव एक असे तीन, घोटवडे तसेच येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांसह शहरातील सुमारे २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. बहुतांश सर्वसामान्य लोक या योजनेचा लाभ घेतात. योजनेत ९७१ आजार आहेत. ३० वेगवेगळ्या तज्ज्ञसेवा आहेत. त्यात हृदयशस्त्रक्रिया, किडनी स्टोन, कर्करोग, आतड्याचे विकार, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, आदींचा समावेश आहे. दीड लाख रुपयांचे रुग्णास पॅकेज मिळते. यावर एम. डी. इंडिया संस्थेचे नियंत्रण आहे. संबंधित समाविष्ट रुग्णालयाला ‘एनआयसी’कडून या योजनेत लाभार्थ्यांचा परतावा मिळतो; पण या रुग्णालयांकडून योग्य सेवा न मिळाल्यास संबंधित रुग्णाला त्याचे पैसे परत केले जातात. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत १४५ प्रकरणांत सुमारे दहा लाख रुपयांचा परतावा संबंधित रुग्णास या रुग्णालयांकडून देण्यात आला आहे.अशी होते कारवाई...४या योजनेसाठी सरकारने व्हिजिलन्स स्क्वाड (भरारीपथक) नेमले आहे. हे पथक केव्हाही, कोणत्याही जिल्ह्णात जाऊन योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात अचानक जाते. या ठिकाणी रुग्णांशी चर्चा करते. ४प्रसंगी त्या रुग्णाच्या घरी जाऊन संबंधित रुग्णालयाने कशी सेवा दिली याविषयी माहिती घेते. त्यानंतर ते संबंधित जिल्हा समन्वयकाकडून त्याची सखोल माहिती मागविते. ४त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचीही समिती माहिती घेते. या समितीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच एम. डी. इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एन.आय.सी), मेडिकल असिस्टंट, पॅरामाउंट या संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग असतो.अशी करा तक्रार ...४लाभधारकांना मुंबईतून ‘सेवेबाबत समाधानी आहे का?’ याबाबत विचारणा होते.४१५५३८८ टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करता येते.४एम. डी. इंडियाच्या भरारी पथकाकडेही तक्रार करता येते. कारणे दाखवा नोटीस...४या योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरामधील एका रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ (शो कॉज) नोटीस बजाविण्यात आली. ४या रुग्णालयाबाबत रुग्णांकडून विविध तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर यापूर्वी शास्त्रीनगरमधील एका रुग्णालयाला अशाच प्रकारची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटिसीनंतर या रुग्णालयाने सेवेत सुधारणा केली.