शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

जिल्ह्यातील दोन रुग्णालये ‘जीवनदायी’तून बाहेर

By admin | Updated: May 22, 2016 00:45 IST

मनमानी कारभार भोवला : आरोग्य योजना समितीचा ‘निरामय’,‘रामकृष्ण’ यांना झटका

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरराज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’त समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्णालयांचे मुंबई येथील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या समितीने निलंबन केले. त्यामुळे या रुग्णालयाला येथून पुढे या योजनेतील कोणतीही प्रक्रिया राबविता येणार नाही. घोटवडे (ता. राधानगरी) येथील ‘रामकृष्ण’ हॉस्पिटल व इचलकरंजी येथील ‘निरामय’ या रुग्णालयांचा निलंबनामध्ये समावेश आहे. या योजनेतील करार व अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर समितीने ही कारवाई १७ मे २०१६ रोजी केली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची कारवाई केली आहे.याबाबत जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांनी दिलेली माहिती अशी की, राज्यातील तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने राज्यात जुलै २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह उर्वरित जिल्ह्णात २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. गरिबांना मोफत उपचार मिळावेत, हा या योजनेमागील उद्देश होता. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हेर्ले, वडगाव, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये दोन, महागाव एक असे तीन, घोटवडे तसेच येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांसह शहरातील सुमारे २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. बहुतांश सर्वसामान्य लोक या योजनेचा लाभ घेतात. योजनेत ९७१ आजार आहेत. ३० वेगवेगळ्या तज्ज्ञसेवा आहेत. त्यात हृदयशस्त्रक्रिया, किडनी स्टोन, कर्करोग, आतड्याचे विकार, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, आदींचा समावेश आहे. दीड लाख रुपयांचे रुग्णास पॅकेज मिळते. यावर एम. डी. इंडिया संस्थेचे नियंत्रण आहे. संबंधित समाविष्ट रुग्णालयाला ‘एनआयसी’कडून या योजनेत लाभार्थ्यांचा परतावा मिळतो; पण या रुग्णालयांकडून योग्य सेवा न मिळाल्यास संबंधित रुग्णाला त्याचे पैसे परत केले जातात. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत १४५ प्रकरणांत सुमारे दहा लाख रुपयांचा परतावा संबंधित रुग्णास या रुग्णालयांकडून देण्यात आला आहे.अशी होते कारवाई...४या योजनेसाठी सरकारने व्हिजिलन्स स्क्वाड (भरारीपथक) नेमले आहे. हे पथक केव्हाही, कोणत्याही जिल्ह्णात जाऊन योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात अचानक जाते. या ठिकाणी रुग्णांशी चर्चा करते. ४प्रसंगी त्या रुग्णाच्या घरी जाऊन संबंधित रुग्णालयाने कशी सेवा दिली याविषयी माहिती घेते. त्यानंतर ते संबंधित जिल्हा समन्वयकाकडून त्याची सखोल माहिती मागविते. ४त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचीही समिती माहिती घेते. या समितीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच एम. डी. इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एन.आय.सी), मेडिकल असिस्टंट, पॅरामाउंट या संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग असतो.अशी करा तक्रार ...४लाभधारकांना मुंबईतून ‘सेवेबाबत समाधानी आहे का?’ याबाबत विचारणा होते.४१५५३८८ टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करता येते.४एम. डी. इंडियाच्या भरारी पथकाकडेही तक्रार करता येते. कारणे दाखवा नोटीस...४या योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरामधील एका रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ (शो कॉज) नोटीस बजाविण्यात आली. ४या रुग्णालयाबाबत रुग्णांकडून विविध तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर यापूर्वी शास्त्रीनगरमधील एका रुग्णालयाला अशाच प्रकारची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटिसीनंतर या रुग्णालयाने सेवेत सुधारणा केली.