शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

By admin | Updated: August 2, 2014 00:21 IST

पंचगंगा इशारा पातळीकडे : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज, शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता उघडले आहेत. या दोन दरवाजांतून प्रतिसेकंद ४८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आगेकूच सुरू आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. शहरात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. परंतु, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आज सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी राधानगरी धरणाचे क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून प्रतिसेकंद ४८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी वारणा धरणातून प्रतिसेकंद १० हजार ९३४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पातळीत वाढ झाली. परिणामी, पंचगंगेची पातळी फुगली आहे. दूधगंगा धरण ७० टक्के भरले असून, कासारी ९८ टक्के भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिला, तर उद्या, शनिवारी वारणा धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी ३६.७ फूट होती. सायंकाळी सहा वाजता ती ३७.१० फुटांपर्यंत वाढली. रात्री बारानंतर पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून, पाऊस, पुराचे पाणी यासह विविध कारणाने तब्बल ४० मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एस.टी.चे सहा मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस-करवीर-२२.१४, कागल-१७.७२, पन्हाळा-४५.२५, शाहूवाडी-१०९, हातकणंगले-१८.०६, शिरोळ-११.८५, राधानगरी-४०.६७, गगनबावडा-११५, भुदरगड-३५, आजरा-३५.२५, चंदगड-२२.८३. (प्रतिनिधी)राधानगरी : गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेले राधानगरी धरण आज, शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरले. सायंकाळी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी तीन व सहा क्रमांकांचे दोन दरवाजे उघडले. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. गतवर्षीच्या तुलनेत पावसाने दीर्घकाळ हुलकावणी देऊनही केवळ नऊ दिवस उशिरा धरण भरले. गतवर्षी २३ जुलैला धरण भरले होते. या धरणाची संचय क्षमता ८.३६ टीएमसी आहे. ३४७.५० फुटांवर पाणीपातळी गेल्यावर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. पाणलोट क्षेत्रात आज पावसाचे प्रमाण कमी होते. शिवाय, धरणस्थळावरील दोन्ही जलविद्युत निर्मिती केंद्रांतून दोन हजार क्युसेक्स जलविसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा दाब नव्हता. परिणामी ही प्रक्रिया लांबली. मात्र, सायंकाळी सहानंतर पावसाचा जोर वाढल्याने सव्वासात वाजता धरणाचे दरवाजे उघडले. आज सकाळी आठ वाजता येथे १४२ मिलिमीटर व एकूण २८५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात ४८०० क्युसेक्स विसर्ग होत आहे. कुरुंदवाड : गेले दोन दिवस चालू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिरोळ बंधारा व कुरुंदवाड अनवडी पुलावर पाणी आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कुरुंदवाड-शिरोळ जुन्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.साळगाव बंधारा दोन दिवस पाण्याखालीपेरणोली : हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुरामुळे साळगाव (ता. आजरा) येथील बंधारा दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहे. पर्यायी सोहाळे मार्गावरून आजरा आगाराने वाहतूक सुरू केली आहे. पेरणोली, साळगाव, हरपवडे, देवकांडगाव, कोरीवडे, वझरे, आदी गावांची आजऱ्याकडे सोहाळे मार्गावरून वाहतूक सुरू आहे. आठ दिवसांतील मुसळधार पावसामुळे आठवड्यात दोनवेळा बंधारा पाण्याखाली गेला आहे.