शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ऑनर किलिंग प्रकरणी दोघा भावांना आजन्म कारावास

By सचिन भोसले | Updated: November 11, 2022 18:40 IST

या घटनेनंतर कोल्हापूर हादरुन गेले होते.

कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दोघा भावांनी तिच्यासह पतीची चाकूचे वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना सिद्ध झाल्याने दोघा सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक-४) एस. पी. गोंधळे यांनी दोषी ठरवत शुक्रवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.गणेश महेंद्र पाटील (वय २५), जयदीप महेंद्र पाटील (वय २४, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निकालाची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी दिली. ऑनर किलिंगची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची टिपण्णी सरकारी वकिलांनी केली. खुनाची घटना डिसेंबर २०१५ मध्ये घडली होती. या खुनाची फिर्याद एका महिलेने दिली होती.या घटनेची हकीकत अशी, आरोपींची बहीण मेघा (वय २१) हिने सावर्डे, ता. पन्हाळा येथील इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय २३) याच्याशी २०१४ आंतरजातीय प्रेमविवाह केला. घरच्याचा विरोध पाहून त्यांनी सावर्डे, ता. पन्हाळा येथून कोल्हापुरातील कसबा बावड्यातील गोळीबार मैदानाजवळील गणेश काॅलनीत भाड्याने खोली घेतली. मेघा हिने ताराबाई पार्कातील एका माॅलमध्ये नोकरी मिळवली. या माॅलमध्ये तिला भावाने एकदा पाहिले. त्यावेळी लग्नाबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. आरोपी गणेश व जयदीप यांना गावामध्ये बहिणीच्या प्रेमविवाहावरून लोक विचारतात व चेष्टा करतात, हे त्यांना आवडले नव्हते. त्यामुळे दोघे भाऊ-बहिणीवर चिडून होते.१६ डिसेंबर २०१५ ला मामाच्या लग्नाचे निमित्त साधून दोघे बाहेर पडले. त्यांनी बहीण व तिच्या पतीला ठार मारण्याचा कट रचला. यात नितीन रामचंद्र काशीद (रा. थेरगाव) याची मदत घेतली. तिघेही एकाच मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी आले. त्यातील आरोपी काशीद हा बाहेर टेहळणी करीत उभा होता. आरोपी गणेश व जयदीप बहीण मेघाच्या घरी गेले. त्यांनी तिला चहा करण्यास सांगितला. चहासाठी दूध आणण्यासाठी तिचा पती इंद्रजित गेला.

यादरम्यान दोघा भावांनी तिच्यावर चाकूने वार केला. तिचा मृतदेह खोलीतील मोरीत ठेवला. थोड्या वेळाने तिचा पती दूध घेऊन आल्यावर दोघांनी त्याच्यावरही अनेक वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फिर्यादी महिला त्या खोलीकडे गेल्या. मात्र, त्यांना काशीदने धक्का मारून पळ काढला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी तपास केला. खटल्याची सुनावणी तत्कालीन सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्यासमोर झाली. त्यांची बदली झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंधळे यांच्यासमोर झाला. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी याकामी १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. साक्षीदारांनी दिलेले साक्ष व ॲड. शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी गणेश पाटील व त्याचा भाऊ जयदीप पाटील यांना ३०२ कलमाखाली दोषी ठरवून आजन्म कारावास, १० हजार रुपये दंड, तो न दिल्यास एक वर्षे सक्तमजुरी सुनावली.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नाबद्दल तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तो न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. यातील तिसरा आरोपी नितीन काशीद यास गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने तीन वर्षे सहा महिने सक्तमजुरी व पाच हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी सहायक फौजदार सुरेश परीट, निवृत्त हवालदार लक्ष्मण लोहार, सहायक फौजदार शाम बुचडे यांनी तपासकामी मदत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय