शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वडिलांनी पगार दिला नाही म्हणून अडीच वर्षाच्या चिमुरडीची हत्या; कोल्हापुरातील हादरवणारी घटना

By सचिन भोसले | Updated: May 20, 2023 12:05 IST

रंकाळा तलावासमोरील एका माॅलमागील शेतातील घटना : संशयितास अटक

कोल्हापूर : वीटभट्टीवर मालकाने पगार दिला नाही. याला वडील कारणीभूत असल्याच्या कारणावरून अडीच वर्षांच्या बालिकेचे भवानी मंडपातून अपहरण करून रंकाळा परिसरातील एका मॉलमागील शेतवाडीतील सिमेंटच्या टाकीत टाकून बालिकेला जिवे मारले. याबद्दल फिरस्ता रांजू विश्वजित मंडल ऊर्फ राजू बिहारी (कोल्हापूर, मूळ रा. बिबीघाट, नथपाडा ता. समुत्रा,जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) या संशयितास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी शुक्रवारी दिली.

पोलिसांनी सांगितले की, गणेश भाऊसाहेब गटे व त्यांची पत्नी पूजा गटे (मूळ रा. लोणी, ता. राहता, जिल्हा अहमदनगर) यांची अडीच वर्षांची मुलगी कार्तिकी व एक वर्षाचा मुलगा असे वीटभट्टीचे कामासाठी बालिंगा पाडळी, ता. करवीर येथे आले आहेत. तेथील काम संपत आल्यामुळे ते गुरुवारी दुपारी १२ वाजता भवानी मंडपात आले होते. तेथे थांबले असता मुलगी कार्तिकी खेळत असताना ती कोठेतरी हरविली. याबाबतची तक्रार वडील गणेश गटे यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. 

नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

त्यात कार्तिकीला ओळखीचा संशयित राजू बिहारी कार्तिकीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. गटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बिहारीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोधासाठी उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी, अभिजित इंगळे व अंमलदार यांच्या तपास पथके तयार करून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मोकळी मैदाने, रंकाळा तलाव, शहरातील उद्याने, सुनसान ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांच्या हाती संशयित राजू बिहारी हा लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा राहण्याच्या नेमका ठिकाणी नव्हता. तो फिरस्ता असल्याचे पुढे आले. त्याच्याकडे कसून चौकशी करता त्याने आपला व गणेश गटे व पूजा गटे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी कामाचे ठिकाणी वाद झाला होता. त्याला कार्तिकीचे वडील जबाबदार आहेत, म्हणून संशयित बिहारीने कार्तिकीला भवानी मंडपातून तिचा खून करण्यासाठी पळवून नेले.

तिला रंकाळा तलावासमोरील एका मार्टच्या मागील अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आर.सी.सी. पाण्याच्या टाकीत जिवे ठार मारले, अशी कबुली संशयित बिहारीने दिली. त्याला गुन्ह्यात शुक्रवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता मंगळवारी (दि. २३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी, अभिजीत इंगळे, सहायक फौजदार अनिल ढवळे, हवालदार परशुराम गुजरे, सतीश भांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, गजानन गुरव आदींनी तपासात सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर