शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:20 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत. पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून, तब्बल १९,५३० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पात्रात जाईल असे झाडे, नाल्यात मृत जनावरांचे सांगाडे अडकलेलेदिसत असल्याने हा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दूधामुळेच शेतकºयांचे संसार उभे राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे आठ लाख दूभती जनावरे असून गावागावात कुकुटपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सुपाने ओतणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अंगात हुडहुडी भरवणारी थंडीने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते, तिथे मुक्या पशु-पक्षांची तर दैना उडाली होती. या वातावरणाने पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले. या आठ दिवसांत जिल्ह्यात १९५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले असून ओढे, नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पात्रात जाईल, तशी मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसू लागले आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुका पशुधन कुक्कुटपक्षीकरवीर ७४ -शाहूवाडी १३ -गगनबावडा ९ -पन्हाळा ३५ -कागल ७ -गडहिंग्लज १२ ३७००चंदगड ६ -भुदरगड २ ८६७०राधानगरी १९ ८०आजरा ५ ३५००शिरोळ ३२ ३००हातकणंगले ४० ३२८०एकूण २५४ १९५३०नुकसान लाखातभरपाई हजारातराज्य सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार तर लहान जनावराला ३ हजार रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.पुराच्या पाण्यात लाख रूपये किमंतीच्या गायी व म्हैशी वाहून गेल्या पण त्याची भरपाई हजारात मिळणार आहे.