शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:20 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत. पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून, तब्बल १९,५३० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पात्रात जाईल असे झाडे, नाल्यात मृत जनावरांचे सांगाडे अडकलेलेदिसत असल्याने हा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दूधामुळेच शेतकºयांचे संसार उभे राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे आठ लाख दूभती जनावरे असून गावागावात कुकुटपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सुपाने ओतणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अंगात हुडहुडी भरवणारी थंडीने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते, तिथे मुक्या पशु-पक्षांची तर दैना उडाली होती. या वातावरणाने पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले. या आठ दिवसांत जिल्ह्यात १९५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले असून ओढे, नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पात्रात जाईल, तशी मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसू लागले आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुका पशुधन कुक्कुटपक्षीकरवीर ७४ -शाहूवाडी १३ -गगनबावडा ९ -पन्हाळा ३५ -कागल ७ -गडहिंग्लज १२ ३७००चंदगड ६ -भुदरगड २ ८६७०राधानगरी १९ ८०आजरा ५ ३५००शिरोळ ३२ ३००हातकणंगले ४० ३२८०एकूण २५४ १९५३०नुकसान लाखातभरपाई हजारातराज्य सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार तर लहान जनावराला ३ हजार रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.पुराच्या पाण्यात लाख रूपये किमंतीच्या गायी व म्हैशी वाहून गेल्या पण त्याची भरपाई हजारात मिळणार आहे.