शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यातील १२ जणी सह्याद्रीतील खडतर सुळके सर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 16:22 IST

tourism Traval Kolhapru- गिर्यारोहणामध्ये राज्यातील मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने गणेश गीध यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून बसाल्ट क्विन मोहीम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली आहे. बारा दिवसांच्या या मोहिमेतून सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९ ते १२ वयोगटांतील १२ मुली सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देबसाल्ट क्विन मोहिमेसाठी सज्ज, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मोहीम गेल्या पाच महिन्यांपासून एकत्र राहून प्रशिक्षण

 कोल्हापूर : गिर्यारोहणामध्ये राज्यातील मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने गणेश गीध यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून बसाल्ट क्विन मोहीम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली आहे. बारा दिवसांच्या या मोहिमेतून सह्याद्रीतील खडतर सुळके सर करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९ ते १२ वयोगटांतील १२ मुली सज्ज झाल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून गुरूकुल पद्धतीने एकत्र राहून त्यांनी गिर्यारोहणाचे तंत्रशिक्षण प्रशिक्षण घेण्यासह सराव केला आहे. या मोहिमेद्वारे गिर्यारोहणात नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषेदत सांगितले.या मोहिमेत कोल्हापुरातील खुशी कांबोज (वय १९), पुण्यातील सौम्या जोशी (१०), गिरीजा लांडे (११), काव्या बोरोलीकर (८), तासगावमधील अरमान मुजावर (२०), मुंबईतील आद्या नायर (१६), नाशिकची तनया कोळी, साताऱ्याची साक्षी प्रभुणे (१६), लोणावळ्यातील तन्वी अहेर (१२), श्रृती शिंदे (१७), ठा‌ण्यातील मायरा सकपाळ (१०), खंडाळ्यातील निशा वाघमारे (१५) सहभागी होतील.

शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या माध्यमातून या मुलींनी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली आहेत. काहींना निवड करण्यापूर्वी गिर्यारोहणाची कल्पनाही नव्हती. क्लायबिंग प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मुली वजीर, नागफणी, संदेवन, वानरलिंगी, तैलबैला, आदी सुळके सर करणार असल्याचे विनोद कांबोज यांनी सांगितले. या पत्रकार परिषेदस प्रमोद पाटील, हृषिकेश केसकर, रोहित वर्तक, नेहा मोरे, कोपल गोयल, दीपक पवार, आनंद गावडे, अनिकेत बोकील उपस्थित होते.सहभागी बसाल्ट क्विन म्हणाल्या

  • अरमान मुजावर : या मोहिमेच्या निमित्ताने पहिल्यांदाच घरातून बाहेर पडले.
  • तनया कोळी : नेतृत्व कसे करायचे, निर्णय कसे घ्यायचे हे समजले.
  • साक्षी प्रभुणे : संघटितपणाचे महत्त्व, वेळेचे नियोजन समजले.
  • आद्या नायर : आत्मनिर्भर कसे व्हायचे याचे ज्ञान मिळाले.
  • खुशी कांबोज : आम्हा सर्वांना गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले.
  • सौम्या जोशी : या प्रशिक्षणामुळे धैर्य, आत्मविश्वास वाढला.

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनkolhapurकोल्हापूर