शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी शिरोली बंद

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

लाटकरांचे विधान बालीशपणाचे

शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी (ता. १५) शिरोली बंदची हाक शुक्रवारी शिरोली हद्दवाढ कृती समितीने दिली आहे. हद्दवाढीच्या विरोधासाठी लोकप्रतिनिधींची शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात बैठक झाली. यावेळी हद्दवाढीच्या विरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी सरपंच बिसमिल्ला महात होत्या.यावेळी महेश चव्हाण म्हणाले, शिरोलीच्या विकासासाठी आम्ही समर्थ असून, भौगोलिक संलग्नतेच्या निकषावर हद्दवाढीस विरोध आहे. नगरपालिकेसाठी आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एमआयडीसीसह नगरपालिका मंजूर करण्यास भाग पाडू.भाजपचे सतीश पाटील म्हणाले, महापालिकेच्या हद्दीतील नवीन वसाहतीत सुविधांची वानवा आहे. महापालिकेच्या शाळा बंद पडत आहेत. कचरा प्रकल्पासाठी आरक्षित जागा कारभाऱ्यांनी आरक्षण उठवून गिळंकृत केल्या. असा ढिसाळ कारभार असलेल्या महापालिकेने आम्हाला विकासाचे स्वप्न दाखवू नये.रविवारी (दि. १४) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक यांना कृती समितीतर्फे निवेदन देण्यात येणार आहेत, तर सोमवारी (दि. १५) शिरोली बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता गावातून हद्दवाढीच्या विरोधात जनजागरण फेरी काढण्यात येणार आहे. यानंतर कृती समितीतर्फे महापालिकेचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर महामार्ग रोको, साखळी उपोषण, बेमुदत बंद असे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी सलिम महात, अनिल खवरे, बबन संकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कदम, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोरवी, शिवाजी समुद्रे, गोविंद घाटगे, हरी पुजारी, जयवंत स्वामी, आनंदा चौगुले, नितीन चव्हाण, डॉ. सुभाष पाटील, विजय चव्हाण, सुभाष चौगुले, राजाराम कपरे उपस्थित होते. आमची स्वतंत्र टाऊनशीपची मागणी आहे, शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र टाऊनशीपचा प्रस्ताव शासनाकडे आहे. नुकतीच सांगलीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टाऊनशीप मंजुरी दिली आहे, याच धर्तीवर आम्हाला ही टाऊनशीप मंजूर करून द्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - राजू पाटील, स्मॅक उपाध्यक्ष.शहरातील उद्यमनगराला आजपर्यंत सुविधा मिळालेल्या नाहीत आणि शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश करून कोणत्या सुविधा देणार, महापालिकेने नागरी वस्ती असलेल्या गावांचा समावेश हद्दवाढीत केला पाहिजे, औद्योगिक वसाहतीत नागरी वस्ती नसताना हद्दवाढ करायची गरजच काय? - कृष्णात पाटील, अ‍ॅग्रीकल्चर असोसिएशन, आयमाहद्दवाढ लादली, तर आम्हाला उद्योग विकून दुसरीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, उद्योगांना वीज दरात भरमसाठ वाढ, एलबीटी हद्दवाढीनंतर उद्योगांवर बसणारे विविध कर यामुळे उद्योग चालवणे शक्य होणार नाही, त्यापेक्षा विकून दुसरीकडे जाणे जास्त सोयीचे होईल. - सचिन पाटील, उद्योजक.लाटकरांचे विधान बालीशपणाचेशहरी व ग्रामीण भाग एकमेकाला पूरक आहेत. शहरात दळणवळण, शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळतात. ग्रामीण भागातून दूध व भाजीपाल्याच्या पुरवठा शहरात होतो. प्रत्येकाची अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सुविधा बंद करतो हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांचे विधान बालीशपणाचे आहे, असा टोला बाजीराव पाटील यांनी लगावला.