शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पर्यटकांना खुणावत आहे धामोड परिसरातील तुळशी जलाशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 10:54 IST

dam tourism Kolhapur-राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापुर-राधानगरी रोडवरील आमजाई व्हरवडे पासून दहा किलोमीटर अंतरावर साकारलेली तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणावू लागले आहे.

ठळक मुद्देपर्यटकांना खुणावत आहे धामोड परिसरातील तुळशी जलाशयपर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू, गाव पर्यटनाच्या नकाशावर

श्रीकांत ऱ्हायकरधामोड-राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या निसर्गरम्य परिसरातील व कोल्हापुर-राधानगरी रोडवरील आमजाई व्हरवडे पासून दहा किलोमीटर अंतरावर साकारलेली तुळशी जलाशय धामोड परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास येत असून पर्यटकांना खुणावू लागले आहे.

मुख्य रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण व त्याचबरोबर गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, केळोशी खुर्द येथील वनराई, ऐतिहासिक किलचा ,येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. या स्थळांना पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज आहे. तसे झाल्यास हे गाव पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकेल.राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन १९६५ साली तुळशी धरणाचा पाया घालण्यात आला व तेरा वर्षानंतर १९७८ साली तुळशी धरण पूर्णत्वाला गेले. पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने परिसरातील जमिनीवर उसाचे मळे डोलू लागले. परिणामी आर्थिक स्थिती सुधारल्याने धामोड परिसरातील दरडोई उत्पन्नाचा आलेख वाढू लागला आहे . दुसरीकडे गेल्या दहा वर्षात येथील तुळशी जलाशयाची ओळख देखील विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर पिकनिक पॉईंट म्हणून वाढत आहे . त्यामुळे धरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे .तुळशी धरणावरून दिसणारे सूर्यास्ताचे अनोखे दर्शन, समोरचा ऐतिहासिक किलचा, तुळशी धरणाच्या पश्चिम बाजूस असणारा लोंढा नाला प्रकल्प, तुळशी धरण काठावरील ज्योतिर्लिंगाचे जागृत देवस्थान, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्याच्या दिवसात इथे कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे डोंगररांगातून अनेक नद्या व धबधबे कोसळतात. हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसातही पर्यटकांची संख्या उल्लेखनीय असते.डोंगर माथ्यावरून तुळशी नदीचा झालेला उगम, येथील निसर्ग रम्य परिसर, थंड हवा, डोंगर, दऱ्यामधून भ्रमंती, वनराईने नटलेला परिसर पर्यटकांना नेहमीच खुणावत असल्याने पर्यटकांची ओढा वाढू लागली आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी तुळशी धरण परिसर पर्यटकांनी हाऊसफुल असतो. शाळेच्या पिकनिक व सहल यांची नेहमीच रेलचेल सुरू असते, मात्र पर्यटनदृष्ट्या हा परिसर अद्यापही दुर्लक्षितच आहे .तुळशी हे निसर्गरम्य ठिकाणे आहे.येथे सतत पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे तुळशी पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी लोकप्रतिनिधींनीच लक्ष देणे गरजेचे आहे.-दीपक भामटेकर,स्थानिक नागरिक, धामोडधामोड (ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणाचा संग्रहित फोटो व धरणावर साकारत असलेली फुलबाग 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनkolhapurकोल्हापूर