शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम महाराज पालखीत छत्रपती घराण्याची पताका, शिवकालीन परंपरा पुन्हा सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:46 IST

स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदाय अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवला.

कोल्हापूर : आषाढी यात्रेला जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या छत्रपती घराण्याकडून जरी पताका देण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला असून, रविवारी या मानाच्या जरी पताकाचे विधिवत पूजन करून मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदाय अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवला. पंढरीच्या वारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे हा जरी पताका होय. तीच परंपरा पुढे अखंडित सुरू ठेवण्यासाठी भक्ती व शक्ती एकत्रितपणे नांदविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सर्व विश्वस्थ यांच्या व युवराज संभाजीराजे यांच्या सहमतीने शिवकालीन परंपरा पुन्हा सुरू करण्याचा एकमताने निर्णय झाला आहे.

यावर्षीपासून मानाचा जरी पताकाचे विधिवत पूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते रविवारी भवानी मंडप, जुना राजवाडा येथे करण्यात आले. जरी पताकाचे मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर ) यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला. हा जरी पताका आज, सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळेला छत्रपती यौवराज शहाजीराजे व मानकरी प्रा. महादेव तळेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

भवानी मंडप येथे झालेल्या जरी पताका पूजन सोहळ्यास फत्तेसिंग सावंत, भास्कर तळेकर, बाबूराव तळेकर, धनंजय तळेकर, विजय गावंधरे, पांडुरंग सुरवसे, प्रसन्न मोहिते, विकास देवाळे, प्रवीण पवार, उदय घोरपडे, डी. के. खाडे, उदय बोंद्रे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर