शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करा-प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 01:01 IST

इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देशरद पवारांना विनंती : बारामती येथे शिष्टमंडळांची भेटवस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी विजेच्या दरात सवलत देऊन सर्व करासहीत प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज द्यावीभविष्यात अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस राहिली तर हा उद्योग कोलमडून पडेल

इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी आपण सरकारकडून प्रयत्न करावेत, अशी विनंती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी याबाबत शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

बारामती येथे आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यावेळी वस्त्रोद्योगातील सद्य:परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. भाजप सत्तेवर आल्यापासून वस्त्रोद्योगातील सर्व योजना बंद केल्या आहेत. टफ्स योजनेंतर्गत मिळणारे अनुदान ३० टक्क्यांवरून १० टक्के केले आहे ते पूर्ववत करावे. इपीएफची सक्ती केली जात आहे. मात्र, शहरातील कारखानदारांचे एका शेडमध्ये वेगवेगळ्या मालकांचे यंत्रमाग असल्याने हा कायदा लागू होत नाही. त्यामुळे तो सरसकट लागू करू नये.

वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी विजेच्या दरात सवलत देऊन सर्व करासहीत प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज द्यावी. यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजामध्ये सात टक्के अनुदान द्यावे. कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली. प्रत्येक वेळी या शासनाकडून आश्वासने मिळाली आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही.भविष्यात अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस राहिली तर हा उद्योग कोलमडून पडेल. त्यामुळे या उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मागण्यांची सोडवणूक करावी, अशी विनंतीकेली.शिष्टमंडळात सुनील पाटील, विलास गाताडे, सतीश कोष्टी, राहुल आवाडे, महेश पाटील, विश्वनाथ अग्रवाल, आदींचा समावेश होता.

टॅग्स :MarketबाजारPower Shutdownभारनियमन