शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

साखरेचे ट्रक अडवून काचा फोडल्या

By admin | Updated: May 26, 2017 00:48 IST

ऊसदरावरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक : जयसिंगपुरात आंदोलन; पाचशेच्या हप्त्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गत गळीत हंगामातील ऊस बिलापोटी पाचशे रुपयांचा हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यातून साखर वाहने सोडणार नाही, अशी भूमिका घेत गुरुवारी शिरोळ-जयसिंगपूर मार्गावर साखर घेऊन जाणारे तीन ट्रक कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या.सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे ते मुंबई आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. २० मे रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना गत गळीत हंगामातील उसाला पाचशे रुपयांचा हप्ता द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले होते. तरीदेखील कारखान्यांनी याची दखल घेतली नसल्याने बुधवारी रात्री कुरुंदवाड येथे साखर घेऊन जाणारे दोन ट्रक अडविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दत्त-शिरोळ कारखान्यातून साखरेचे तीन ट्रक जयसिंगपूरकडे येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती. जिरगे पेट्रोल पंप ते केपीटी या दरम्यान सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्ते जमा झाले. यावेळी साखर वाहतूक करणारे ट्रक क्र. आरजे १९ जीई ८३५७, आरजे १९ जीई ६८०७ व आरजे १९ जीई ८५१७ असे तीन ट्रक अडविण्यात आले. घोषणा देत ट्रकवर दगडफेक केली. यामध्ये तीनही ट्रकच्या समोरील काचांचा चक्काचूर झाला. ट्रकच्या चाकातील व्हॉल्व्ह तोडण्यात आले. घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी येऊन पंचनामा केला.दरम्यान, सध्या साखरेला चांगला भाव आहे. २० तारखेला कारखान्यांना ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना पाचशे रुपयांचा हप्ता द्यावा, याबाबत निवेदन दिले होते. कारखान्यातील साखर बाहेर पडली तर वाहने रोखणार, असा इशारा देखील दिला होता. तरी देखील साखरेची वाहने सोडण्यात आल्याने आम्ही गुरुदत्त व दत्त कारखान्याची वाहने रोखली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जि. प.चे माजी सदस्य सावकार मादनाईक यांनी दिला.वाहनांवर वॉचउसाचा दुसरा हप्ता मिळेपर्यंत एकही वाहन बाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. पुणे-मुंबई आत्मक्लेश आंदोलन खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी असले तरी साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवण्यासाठीही स्वाभिमानीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.