शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

By admin | Updated: April 25, 2016 01:01 IST

कारखाना निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस; तिरंगी लढतीची शक्यता, माघारीपर्यंत केवळ चर्चाच

ज्योतीप्रसाद सावंत--आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप आघाड्यांचा तिढा न सुटला नाही. त्यामुळे प्रसंगी स्वतंत्र आघाडीची तयारी ठेवत प्रमुख नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याने विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गतवेळी एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे गेलेल्या मंडळींनी आपापला सवतासुभा ठेवून पाच वर्षांची वाटचाल सुरू ठेवली. अनेकांनी आपल्या नेत्यांना रामराम करून सोयीने नेते स्वीकारले. काही मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला. यामुळे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.दरम्यान, झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, तालुका संघ येथेही या संघर्षाचे पडसाद उमटत गेले. या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले. एक आमदार गमवावा लागला तर कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनीही पक्षाशी फारकत घेतली.गेल्या वर्षभरात तर सत्ताधाऱ्यांमधील वाद जगजाहीर झाले. यातून चार भिंतीमधील चर्चा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. गोपनियता हा प्रकारच राहिला नाही. अनेक संचालकांची सुधारलेली आर्थिक स्थिती सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटली नाही. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्त्यांना कारखाना संचालकपदाची स्वप्ने पडू लागली. वेळोवेळी राजकीय पेचात सापडणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडून आपली कारखान्याची उमेदवारी घट्ट करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. नेत्यांनीही शब्द देऊन वेळ मारून नेली आणि आता मात्र ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने नेतेमंडळींना कार्यकर्त्यांचे ‘बंड’ थोपविण्याचे नव्हे आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.अण्णा-भाऊ संस्था समूहप्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनाच आव्हान देत जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे. प्रचंड यंत्रणा व आर्थिक पाठबळ यामुळे अशोकअण्णांसोबत जाण्यास अनेकजण इच्छुक आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रवींद्र आपटे यांचा गट, विश्वनाथ करंबळी, श्रीपतराव देसाई यांच्यासह विद्यमान आठ संचालक यांनी यापूर्वीच अशोकअण्णांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष आहे. अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदय पवार, सुधीर देसाई अशी बड्या नेतेमंडळींची फौज राष्ट्रवादीकडे आहे. सोबत राष्ट्रीय काँगे्रस व छोटे-मोठे गट आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांचा भक्कम आधार हे राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. सद्य:स्थितीत जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारी मंडळी कितपत एकत्र राहणार यावरही राष्ट्रवादीचे यशापयश अवलंबून आहे.एकीकडे अशोकअण्णांनी आपणाला कुणाचेही वावडे नाही असे सांगून आघाडीची बांधणी सुरू केली असताना राष्ट्रवादीत मात्र हा नको, तो नको, असाच सूरच आहे. गडहिंग्लज कारखाना निवडणूक निकालातून राष्ट्रवादीने काहीही बोध घेतलेला नाही. हेदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून माघारीपर्यंत चर्चाही सुरू राहणार आहे.चंद्रकांतदादांचीही फिल्डिंगसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजरा साखर कारखाना पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावली आहे.एका बड्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. हा नेता गळाला लागला तर सर्व रसद पुरवून विरोधी आघाडी भक्कम करून ‘भाजप’च्या लेबलवर निवडणूक जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.