शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

By admin | Updated: April 25, 2016 01:01 IST

कारखाना निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस; तिरंगी लढतीची शक्यता, माघारीपर्यंत केवळ चर्चाच

ज्योतीप्रसाद सावंत--आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप आघाड्यांचा तिढा न सुटला नाही. त्यामुळे प्रसंगी स्वतंत्र आघाडीची तयारी ठेवत प्रमुख नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याने विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गतवेळी एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे गेलेल्या मंडळींनी आपापला सवतासुभा ठेवून पाच वर्षांची वाटचाल सुरू ठेवली. अनेकांनी आपल्या नेत्यांना रामराम करून सोयीने नेते स्वीकारले. काही मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला. यामुळे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.दरम्यान, झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, तालुका संघ येथेही या संघर्षाचे पडसाद उमटत गेले. या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले. एक आमदार गमवावा लागला तर कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनीही पक्षाशी फारकत घेतली.गेल्या वर्षभरात तर सत्ताधाऱ्यांमधील वाद जगजाहीर झाले. यातून चार भिंतीमधील चर्चा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. गोपनियता हा प्रकारच राहिला नाही. अनेक संचालकांची सुधारलेली आर्थिक स्थिती सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटली नाही. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्त्यांना कारखाना संचालकपदाची स्वप्ने पडू लागली. वेळोवेळी राजकीय पेचात सापडणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडून आपली कारखान्याची उमेदवारी घट्ट करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. नेत्यांनीही शब्द देऊन वेळ मारून नेली आणि आता मात्र ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने नेतेमंडळींना कार्यकर्त्यांचे ‘बंड’ थोपविण्याचे नव्हे आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.अण्णा-भाऊ संस्था समूहप्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनाच आव्हान देत जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे. प्रचंड यंत्रणा व आर्थिक पाठबळ यामुळे अशोकअण्णांसोबत जाण्यास अनेकजण इच्छुक आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रवींद्र आपटे यांचा गट, विश्वनाथ करंबळी, श्रीपतराव देसाई यांच्यासह विद्यमान आठ संचालक यांनी यापूर्वीच अशोकअण्णांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष आहे. अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदय पवार, सुधीर देसाई अशी बड्या नेतेमंडळींची फौज राष्ट्रवादीकडे आहे. सोबत राष्ट्रीय काँगे्रस व छोटे-मोठे गट आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांचा भक्कम आधार हे राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. सद्य:स्थितीत जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारी मंडळी कितपत एकत्र राहणार यावरही राष्ट्रवादीचे यशापयश अवलंबून आहे.एकीकडे अशोकअण्णांनी आपणाला कुणाचेही वावडे नाही असे सांगून आघाडीची बांधणी सुरू केली असताना राष्ट्रवादीत मात्र हा नको, तो नको, असाच सूरच आहे. गडहिंग्लज कारखाना निवडणूक निकालातून राष्ट्रवादीने काहीही बोध घेतलेला नाही. हेदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून माघारीपर्यंत चर्चाही सुरू राहणार आहे.चंद्रकांतदादांचीही फिल्डिंगसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजरा साखर कारखाना पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावली आहे.एका बड्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. हा नेता गळाला लागला तर सर्व रसद पुरवून विरोधी आघाडी भक्कम करून ‘भाजप’च्या लेबलवर निवडणूक जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.