शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विमानाने कोल्हापुरातून मुंबईला जाणे दुबईपेक्षाही महाग; केंद्राच्या उद्देशालाच हरताळ

By पोपट केशव पवार | Updated: March 1, 2025 11:52 IST

देशात कुठेच नाहीत इतके दर

पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला स्वस्तात विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकर पुरते हरखून गेले होते. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता कोल्हापुरातून मुंबईला जाणे म्हणजे दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाले आहे. ज्या विमान कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे, त्या कंपनीने १७ ते १८ हजार रुपये असे अव्वाच्या सव्वा प्रवासी तिकीट दर केल्याने कोल्हापुरातील प्रवाशांना पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स, रेल्वेचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबर उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांना मुंबईतील एखादे काम आटपून त्याच दिवशी परत कोल्हापुरात येता येते. याचे दरही सुरुवातीच्या काळात अडीच हजार रुपयांच्या आसपास असल्याने प्रवाशांचा या सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन संबंधित विमान कंपनीने हेच दर वाढवले आहेत. परिणामी, कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्यांना हे दर परवडणारे नाहीत, असे प्रवासी रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने मुंबई गाठत आहेत.देशात कुठेच नाहीत इतके दरदेशांतर्गत प्रवासात पूर्ण भारतात विमानाचे इतके दर कुठेच नाहीत. मुंबई-दुबई या मार्गावरही अगदी दहा हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत दर आहेत. जास्त अंतर असणाऱ्या विमानसेवेचे दर कमी असताना, कमी अंतर असूनही कोल्हापूर-मुंबई या सेवेचे दर मात्र चढेच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्राच्या उद्देशालाच हरताळ, तिकीट दर चढेचकेंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई ही सेवा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवास सुलभ व्हावा, यासाठी केंद्राने ही योजना वसुरू केली. मात्र, कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सर्वसामान्यांनाच काय श्रीमंतानांही आता परवडणारे नाही, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-मुंबई या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने येथे दुसरीही सेवाही सुरू होऊ शकते. त्यासाठी इतर कंपन्यांनीही परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.असे आहेत तिकीट दरकोल्हापूर-मुंबई (वेळ : ४० मिनिट) -१७-१८ हजारमुंबई-दुबई (१.४० मि.)-१०-१५ हजार 

सध्या मात्र, कोल्हापूर-मुंबई या विमानाचे तिकीट १८ ते २० हजार रुपये आहे. या तिकीट दराबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी कोणीच बोलत नाहीत हे दुर्दैवी आहे. सवलतीच्या दरातील सुरुवातीची ५० टक्के तिकीट आधीच एजंटामार्फत बुक केली जातात. नंतर ती रद्द करण्यात आली असे दाखवून तीही पुन्हा १८ ते २० हजार रुपयांना विकली जात आहेत. - व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष-शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासीMumbaiमुंबईDubaiदुबई