शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानाने कोल्हापुरातून मुंबईला जाणे दुबईपेक्षाही महाग; केंद्राच्या उद्देशालाच हरताळ

By पोपट केशव पवार | Updated: March 1, 2025 11:52 IST

देशात कुठेच नाहीत इतके दर

पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला स्वस्तात विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकर पुरते हरखून गेले होते. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता कोल्हापुरातून मुंबईला जाणे म्हणजे दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाले आहे. ज्या विमान कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे, त्या कंपनीने १७ ते १८ हजार रुपये असे अव्वाच्या सव्वा प्रवासी तिकीट दर केल्याने कोल्हापुरातील प्रवाशांना पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स, रेल्वेचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबर उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांना मुंबईतील एखादे काम आटपून त्याच दिवशी परत कोल्हापुरात येता येते. याचे दरही सुरुवातीच्या काळात अडीच हजार रुपयांच्या आसपास असल्याने प्रवाशांचा या सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन संबंधित विमान कंपनीने हेच दर वाढवले आहेत. परिणामी, कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्यांना हे दर परवडणारे नाहीत, असे प्रवासी रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने मुंबई गाठत आहेत.देशात कुठेच नाहीत इतके दरदेशांतर्गत प्रवासात पूर्ण भारतात विमानाचे इतके दर कुठेच नाहीत. मुंबई-दुबई या मार्गावरही अगदी दहा हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत दर आहेत. जास्त अंतर असणाऱ्या विमानसेवेचे दर कमी असताना, कमी अंतर असूनही कोल्हापूर-मुंबई या सेवेचे दर मात्र चढेच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्राच्या उद्देशालाच हरताळ, तिकीट दर चढेचकेंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई ही सेवा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवास सुलभ व्हावा, यासाठी केंद्राने ही योजना वसुरू केली. मात्र, कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सर्वसामान्यांनाच काय श्रीमंतानांही आता परवडणारे नाही, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-मुंबई या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने येथे दुसरीही सेवाही सुरू होऊ शकते. त्यासाठी इतर कंपन्यांनीही परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.असे आहेत तिकीट दरकोल्हापूर-मुंबई (वेळ : ४० मिनिट) -१७-१८ हजारमुंबई-दुबई (१.४० मि.)-१०-१५ हजार 

सध्या मात्र, कोल्हापूर-मुंबई या विमानाचे तिकीट १८ ते २० हजार रुपये आहे. या तिकीट दराबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी कोणीच बोलत नाहीत हे दुर्दैवी आहे. सवलतीच्या दरातील सुरुवातीची ५० टक्के तिकीट आधीच एजंटामार्फत बुक केली जातात. नंतर ती रद्द करण्यात आली असे दाखवून तीही पुन्हा १८ ते २० हजार रुपयांना विकली जात आहेत. - व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष-शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासीMumbaiमुंबईDubaiदुबई