शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

विमानाने कोल्हापुरातून मुंबईला जाणे दुबईपेक्षाही महाग; केंद्राच्या उद्देशालाच हरताळ

By पोपट केशव पवार | Updated: March 1, 2025 11:52 IST

देशात कुठेच नाहीत इतके दर

पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला स्वस्तात विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकर पुरते हरखून गेले होते. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता कोल्हापुरातून मुंबईला जाणे म्हणजे दुबईला जाण्यापेक्षाही महाग झाले आहे. ज्या विमान कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू आहे, त्या कंपनीने १७ ते १८ हजार रुपये असे अव्वाच्या सव्वा प्रवासी तिकीट दर केल्याने कोल्हापुरातील प्रवाशांना पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स, रेल्वेचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांबरोबर उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांना मुंबईतील एखादे काम आटपून त्याच दिवशी परत कोल्हापुरात येता येते. याचे दरही सुरुवातीच्या काळात अडीच हजार रुपयांच्या आसपास असल्याने प्रवाशांचा या सेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन संबंधित विमान कंपनीने हेच दर वाढवले आहेत. परिणामी, कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ज्यांना हे दर परवडणारे नाहीत, असे प्रवासी रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने मुंबई गाठत आहेत.देशात कुठेच नाहीत इतके दरदेशांतर्गत प्रवासात पूर्ण भारतात विमानाचे इतके दर कुठेच नाहीत. मुंबई-दुबई या मार्गावरही अगदी दहा हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत दर आहेत. जास्त अंतर असणाऱ्या विमानसेवेचे दर कमी असताना, कमी अंतर असूनही कोल्हापूर-मुंबई या सेवेचे दर मात्र चढेच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केंद्राच्या उद्देशालाच हरताळ, तिकीट दर चढेचकेंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई ही सेवा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवास सुलभ व्हावा, यासाठी केंद्राने ही योजना वसुरू केली. मात्र, कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी सर्वसामान्यांनाच काय श्रीमंतानांही आता परवडणारे नाही, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-मुंबई या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने येथे दुसरीही सेवाही सुरू होऊ शकते. त्यासाठी इतर कंपन्यांनीही परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.असे आहेत तिकीट दरकोल्हापूर-मुंबई (वेळ : ४० मिनिट) -१७-१८ हजारमुंबई-दुबई (१.४० मि.)-१०-१५ हजार 

सध्या मात्र, कोल्हापूर-मुंबई या विमानाचे तिकीट १८ ते २० हजार रुपये आहे. या तिकीट दराबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी कोणीच बोलत नाहीत हे दुर्दैवी आहे. सवलतीच्या दरातील सुरुवातीची ५० टक्के तिकीट आधीच एजंटामार्फत बुक केली जातात. नंतर ती रद्द करण्यात आली असे दाखवून तीही पुन्हा १८ ते २० हजार रुपयांना विकली जात आहेत. - व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष-शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासीMumbaiमुंबईDubaiदुबई