शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:01 IST

शिरोली : तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तावडे ...

शिरोली : तावडे हॉटेल चौकात वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तावडे हॉटेल बोगदा आणि चौक जाम झाला होता. यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.गांधीनगरहून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूरकडून गांधीनगरच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा शिरोली जकात नाका निगडेवाडी पर्यंत गेल्या. तर पुणे बंगळूर महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली. बंगळूरहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक कोंडी झाली तसेच पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प होवून वाहनांची रांग लांब पर्यंत गेली होती. याठिकाणची वाहतुकीची समस्या गेल्या अनेक दिवसापासून आहे.तावडे हॉटेल बोगदा लहान असल्याने येथे वाहतूक कोंडी होते ही कोंडी कमी करण्यासाठी कायमपणे वाहतूक पोलीस ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी