शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘राजे संभाजी’ची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा

By admin | Updated: September 5, 2016 00:27 IST

२७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली : काहिलीत विसर्जन करून रंकाळा संवर्धनाचे पाऊल

कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्ताने समाजाचे ऋण फेडत विधायक कामातून आदर्श निर्माण करण्याची परंपरा कोल्हापुरात आहे. राज्याला आदर्शवत ठरलेल्या गणेशमूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा गेल्या २७ वर्षांपासून शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाने जोपासली आहे. काहिलीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची मुहूर्तमेढ या मंडळाने कोल्हापुरात रोवली आहे. कोल्हापूरचे वैभव रंकाळ्याचे संवर्धन करण्यासह पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी १९८९ मध्ये श्री राजे संभाजी तरुण मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनाचा उपक्रम सुरू केला. मंडळाने काहिली ठेवून कोल्हापूरकरांना गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन केले. प्रारंभी या उपक्रमाला काहीजणांनी विरोध केला; पण, पुरोगामी विचाराने काम करणाऱ्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्य सुरूच ठेवले. त्याला वर्षागणिक प्रतिसाद वाढू लागला. त्यातून काहिलीतील गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा निर्माण झाली. कोल्हापूरकरांनी या उपक्रमात सहभागी होत सात हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. सुनील हराळे, विकास जाधव, शरद तांबट, गुरू चौगुले, अमित मरळकर, अनिल उगळे, सतीश कुसुंबे, संतोष चव्हाण हे कार्यकर्ते ही मंडळाची ताकद आहे. शाडूच्या मूर्तींसाठी प्रबोधन निर्माल्यासह प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनाचे प्रमाण वाढल्याने रंकाळ्याचे प्रदूषण वाढले. राजे संभाजी तरुण मंडळाने तत्कालीन अध्यक्ष दिलीप कदम यांच्या नेतृत्वाखाली काहिलीत गणेशमूर्ती विसर्जन सुरू केले. २७ वर्षांपासून हा उपक्रम अखंड सुरू असून, त्याला पाठबळ दिल्याने त्याची व्याप्ती वाढल्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित चव्हाण यांनी सांगितले. विविध विधायक उपक्रम खाशाबा जाधव यांच्या पत्नीचा सन्मान, जटा निर्मूलन, गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मदत, प्लास्टिक हटाव, असे उपक्रम राबविले. या मंडळाने सामाजिक देखाव्यातून काम सुरूच ठेवले. रंकाळा संवर्धन कृती समितीची स्थापनाही केली. वसुंधरा सन्मानासह विविध पुरस्कार मंडळाला मिळाल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय आंग्रे यांनी सांगितले. राज्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं विसर्जनाचा उपक्रम आमच्या मंडळाने राबविला. जलप्रदूषण टाळण्यासाठी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन, शाडूच्या मूर्ती वापरण्यासाठी मंडळ प्रबोधन करणार आहे. - अजित चव्हाण, माजी अध्यक्ष मंडळाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाचे राज्यातील संस्थांनी अनुकरण केले. हा उपक्रम राज्यात राबविला जात असल्याचे समाधान आहे. मंडळातर्फे विविध विधायक उपक्रम राबविले जात आहेत. - संजय आंग्रे, अध्यक्ष