शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची परंपरा जपली जावी

By admin | Updated: June 13, 2017 01:02 IST

पेहरावसंबंधी वाद : विविध व्यक्ती संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला करण्यात आलेल्या घागरा-चोलीच्या पेहरावविरोधात विविध व्यक्ती व संस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. पुजारीमुक्त मंदिर व्हावे : शरद तांबट श्री अंबाबाई मूर्तीचे अपुरे संवर्धन, मंदिरातील दुरवस्था आणि श्रीपूजकांचे गैरवर्तन याबाबत देवस्थानने आवाज उठवून आठवडा झाला नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोलीचा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शासनाने हे मंदिर श्रीपूजकमुक्त करून सर्वसमावेशक पुजारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या भक्ताने लाख रुपये देऊन आपल्या नामांच्या वस्त्रांची जाहिरात करायला सांगितली तर श्रीपूजक त्या पद्धतीने पूजा करतील. शासनानेच अंबाबाईची ही अवहेलना थांबवावी. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या श्रीपूजकांची हकालपट्टी करून त्याजागी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजारी मंडळ ताबडतोब नेमण्यात यावे. अंबाबाईच्या पूजेची संस्कृती जपावी : सुरेश साळोखेगेली हजारो वर्षे श्री अंबाबाई देवीची पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा व परंपरेला फाटा देत श्रीपूजकांनी चोली-घागरा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवून अंबाबाईची संस्कृती जपावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश साळोखे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, साडी-चोळी हा श्री अंबाबाईचा पारंपरिक पेहराव असतानाही पैशाच्या आमिषापोटी भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीपूजकांच्या चुकीच्या कृत्यामुळे मंदिराचे व्यापारीकरण चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी होत आहे. पूजेच्या नावाखाली खेळखंडोबा होऊन देवीचे पावित्र्य नष्ट होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीचे दोन सदस्य, श्रीपूजकांचेदोन सदस्य, जिल्हा पोलीसप्रमुख, नागरिकांमधील दोन सदस्य अशी दहा जणांची समन्वय समिती स्थापन करून संवादाने हा वाद मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, दीपक मगदूम, सुरेश पाटील, अनिल साळोखे, दिलीप जाधव, दिलीप देसाई, युवराज खंडागळे, राजू मोहिते, मुबारक शेख, प्रसाद कुलकर्णी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अंबाबाईची संस्कृती जपावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.