शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

अंबाबाईची परंपरा जपली जावी

By admin | Updated: June 13, 2017 01:02 IST

पेहरावसंबंधी वाद : विविध व्यक्ती संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला करण्यात आलेल्या घागरा-चोलीच्या पेहरावविरोधात विविध व्यक्ती व संस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. पुजारीमुक्त मंदिर व्हावे : शरद तांबट श्री अंबाबाई मूर्तीचे अपुरे संवर्धन, मंदिरातील दुरवस्था आणि श्रीपूजकांचे गैरवर्तन याबाबत देवस्थानने आवाज उठवून आठवडा झाला नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोलीचा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शासनाने हे मंदिर श्रीपूजकमुक्त करून सर्वसमावेशक पुजारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या भक्ताने लाख रुपये देऊन आपल्या नामांच्या वस्त्रांची जाहिरात करायला सांगितली तर श्रीपूजक त्या पद्धतीने पूजा करतील. शासनानेच अंबाबाईची ही अवहेलना थांबवावी. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या श्रीपूजकांची हकालपट्टी करून त्याजागी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजारी मंडळ ताबडतोब नेमण्यात यावे. अंबाबाईच्या पूजेची संस्कृती जपावी : सुरेश साळोखेगेली हजारो वर्षे श्री अंबाबाई देवीची पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा व परंपरेला फाटा देत श्रीपूजकांनी चोली-घागरा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवून अंबाबाईची संस्कृती जपावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश साळोखे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, साडी-चोळी हा श्री अंबाबाईचा पारंपरिक पेहराव असतानाही पैशाच्या आमिषापोटी भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीपूजकांच्या चुकीच्या कृत्यामुळे मंदिराचे व्यापारीकरण चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी होत आहे. पूजेच्या नावाखाली खेळखंडोबा होऊन देवीचे पावित्र्य नष्ट होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीचे दोन सदस्य, श्रीपूजकांचेदोन सदस्य, जिल्हा पोलीसप्रमुख, नागरिकांमधील दोन सदस्य अशी दहा जणांची समन्वय समिती स्थापन करून संवादाने हा वाद मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, दीपक मगदूम, सुरेश पाटील, अनिल साळोखे, दिलीप जाधव, दिलीप देसाई, युवराज खंडागळे, राजू मोहिते, मुबारक शेख, प्रसाद कुलकर्णी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अंबाबाईची संस्कृती जपावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.