शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

अंबाबाईची परंपरा जपली जावी

By admin | Updated: June 13, 2017 01:02 IST

पेहरावसंबंधी वाद : विविध व्यक्ती संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला करण्यात आलेल्या घागरा-चोलीच्या पेहरावविरोधात विविध व्यक्ती व संस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. पुजारीमुक्त मंदिर व्हावे : शरद तांबट श्री अंबाबाई मूर्तीचे अपुरे संवर्धन, मंदिरातील दुरवस्था आणि श्रीपूजकांचे गैरवर्तन याबाबत देवस्थानने आवाज उठवून आठवडा झाला नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोलीचा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शासनाने हे मंदिर श्रीपूजकमुक्त करून सर्वसमावेशक पुजारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या भक्ताने लाख रुपये देऊन आपल्या नामांच्या वस्त्रांची जाहिरात करायला सांगितली तर श्रीपूजक त्या पद्धतीने पूजा करतील. शासनानेच अंबाबाईची ही अवहेलना थांबवावी. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या श्रीपूजकांची हकालपट्टी करून त्याजागी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजारी मंडळ ताबडतोब नेमण्यात यावे. अंबाबाईच्या पूजेची संस्कृती जपावी : सुरेश साळोखेगेली हजारो वर्षे श्री अंबाबाई देवीची पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा व परंपरेला फाटा देत श्रीपूजकांनी चोली-घागरा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवून अंबाबाईची संस्कृती जपावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश साळोखे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, साडी-चोळी हा श्री अंबाबाईचा पारंपरिक पेहराव असतानाही पैशाच्या आमिषापोटी भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीपूजकांच्या चुकीच्या कृत्यामुळे मंदिराचे व्यापारीकरण चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी होत आहे. पूजेच्या नावाखाली खेळखंडोबा होऊन देवीचे पावित्र्य नष्ट होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीचे दोन सदस्य, श्रीपूजकांचेदोन सदस्य, जिल्हा पोलीसप्रमुख, नागरिकांमधील दोन सदस्य अशी दहा जणांची समन्वय समिती स्थापन करून संवादाने हा वाद मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, दीपक मगदूम, सुरेश पाटील, अनिल साळोखे, दिलीप जाधव, दिलीप देसाई, युवराज खंडागळे, राजू मोहिते, मुबारक शेख, प्रसाद कुलकर्णी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अंबाबाईची संस्कृती जपावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.