शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन कायम राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. केवळ चार तासांतच व्यापार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने १६ मेपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. आज, सोमवारपासून त्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, राज्य सरकारचा लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे. व्यापार करण्यासाठी सकाळी ७ ही वेळे गैरसोयीची आहे. चार तासच दिल्याने सकाळी १० ते ११ या वेळेतच ग्राहकांची गर्दी होते. परिणामी गर्दीवर नियंत्रण ठेवणे संबंधित दुकानदाराला शक्य होत नाही.

कमी वेळेमुळे ग्राहकांनाही दुकानदार देईल तशी वस्तू घेऊन जावे लागते. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही सकाळच्या टप्प्यातील वेळ गैरसोयीची आहे. वेळ वाढवून मिळण्यासाठी चेंबर कॉमर्सतर्फे प्रयत्न करीत आहे; पण जिल्हा प्रशासन सरकारकडे बोट दाखवत चेंबरच्या मागणी बेदखल करीत आहे. यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख पदाधिकारी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेणार आहेत.

चौकट

सराफ व्यावसायिकांत चिंता

सराफ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यातही नाराजी निर्माण झाली आहे. ऐन लग्नाच्या हंगामातच लॉकडाऊन झाल्याने सराफ व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर १ जूनपर्यंत बंद राहणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

रोज ६० कोटींपर्यंत नुकसान

लग्न सराई, विविध कार्यक्रमांच्या हंगामातच कडक लॉकडाऊन लागू केल्याने शहर आणि जिल्ह्यात रोज ६० कोटींचा फटका बसला आहे. विविध प्रकारच्या दुकानांत काम करणाऱ्या कामगारांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. म्हणूनच कोरोना प्रतिबंधासाठी सर्व प्रकारची काळजी, आरोग्य प्रशासनाचे नियम पाळतो, पण दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सर्वच व्यापाऱ्यांची आहे.

कोट

कडक लॉकडाऊन उठला तरी वेळेचे बंधन कायम असणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच व्यापार करताना अडचणी येतात. वेळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून सकाळी ९ ते ५ यावेळेत सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे.

संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

कोट

सकाळच्या टप्प्यात चार तासच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन जाचक आहे. ही अट शिथिल झाली पाहिजे. अन्यथा व्यापारी, दुकानदारासमोरील अडचणी पुन्हा वाढणार आहेत. दिवसभर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

केतन तौटे, खाद्यतेल दुकानदार

--------