शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन कायम राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. केवळ चार तासांतच व्यापार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने १६ मेपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. आज, सोमवारपासून त्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, राज्य सरकारचा लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे. व्यापार करण्यासाठी सकाळी ७ ही वेळे गैरसोयीची आहे. चार तासच दिल्याने सकाळी १० ते ११ या वेळेतच ग्राहकांची गर्दी होते. परिणामी गर्दीवर नियंत्रण ठेवणे संबंधित दुकानदाराला शक्य होत नाही.

कमी वेळेमुळे ग्राहकांनाही दुकानदार देईल तशी वस्तू घेऊन जावे लागते. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही सकाळच्या टप्प्यातील वेळ गैरसोयीची आहे. वेळ वाढवून मिळण्यासाठी चेंबर कॉमर्सतर्फे प्रयत्न करीत आहे; पण जिल्हा प्रशासन सरकारकडे बोट दाखवत चेंबरच्या मागणी बेदखल करीत आहे. यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख पदाधिकारी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेणार आहेत.

चौकट

सराफ व्यावसायिकांत चिंता

सराफ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यातही नाराजी निर्माण झाली आहे. ऐन लग्नाच्या हंगामातच लॉकडाऊन झाल्याने सराफ व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर १ जूनपर्यंत बंद राहणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

रोज ६० कोटींपर्यंत नुकसान

लग्न सराई, विविध कार्यक्रमांच्या हंगामातच कडक लॉकडाऊन लागू केल्याने शहर आणि जिल्ह्यात रोज ६० कोटींचा फटका बसला आहे. विविध प्रकारच्या दुकानांत काम करणाऱ्या कामगारांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. म्हणूनच कोरोना प्रतिबंधासाठी सर्व प्रकारची काळजी, आरोग्य प्रशासनाचे नियम पाळतो, पण दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सर्वच व्यापाऱ्यांची आहे.

कोट

कडक लॉकडाऊन उठला तरी वेळेचे बंधन कायम असणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच व्यापार करताना अडचणी येतात. वेळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून सकाळी ९ ते ५ यावेळेत सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे.

संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

कोट

सकाळच्या टप्प्यात चार तासच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन जाचक आहे. ही अट शिथिल झाली पाहिजे. अन्यथा व्यापारी, दुकानदारासमोरील अडचणी पुन्हा वाढणार आहेत. दिवसभर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

केतन तौटे, खाद्यतेल दुकानदार

--------