शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

प्रशिक्षित चालकांची गरज : वाहतूक नियमांची अंमलबजावणी अपघातास आळा घालेल

घन:शाम कुंभार -यड्राव साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीस प्राधान्य असते; परंतु चालकांचा अतिआत्मविश्वास व अल्लडपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपघातात बळी जात असून, अपघाताच्या घटना सुरू आहेत. हे रोखण्यासाठी साखर कारखान्यांसह ट्रॅक्टरमालकांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक नियंत्रण विभागाकडून होणारी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणीच अपघातास आळा घालेल, अन्यथा ‘साखरनिर्मितीचा हंगाम अपघाताचा सिझन’ असे ब्रीदवाक्य होईल. याची दक्षता घेणे सर्वांच्या हिताचे आहे.साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एकाच वेळी जादा वापर केला जातो; परंतु यावरील चालक अप्रशिक्षित व वाहतूक नियमाबाबत अनभिज्ञ व व्यसनी असतात. यामुळे इतरांपेक्षा जादा ऊस वाहतुकीची ईर्षा असल्याने वाहनाची क्षमता व अधिकृत परवानापेक्षा जादा ऊस भरल्याने वेग मर्यादा पाळताना चुका होतात. त्याचा परिणाम अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.वाहनचालकांचे एकाच फेरीत जादा ऊस वाहतूक करण्याच्या प्रयत्नात शेतामध्ये ट्रॉली अडकून पडते. शेतात अडकलेली ट्रॉली बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर किंवा क्रेनचा वापर करावा लागत असल्याने त्याच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांस सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा प्रकारात वाहनांची मोडतोड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहनमालकास बसतो. एकूणच चालकाकडे नसलेला पोक्तपणा व अतिआत्मविश्वास इतरांना नुकसानकारक ठरत आहे.रस्ते वाहतूक नियंत्रण विभागही याकडे लक्ष देत नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतूक विभागाकडून एखाद्या-दुसऱ्या वाहनास रिप्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यापुरताच हा विभाग असल्याचा भास होतो.ट्रॉलीमध्ये परवाना क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, ट्रॅक्टरवर मोठ्याने रेडिओ अथवा गाणी लावू नयेत, वाहनचालक समजदार व प्रशिक्षित असावा, वाहनांच्या मागे रिफ्लेटर असावा, चालक निर्व्यसनी असावा, ट्रॉलीस ब्रेकची सुविधा असावी, याकरिता ट्रॅक्टरमालकासह साखर कारखान्यांनी विशेष लक्ष देणे सामाजिक हिताचे आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे, यामुळेच अपघाताचे प्रमाण घटणार आहे, नाही तर गोड साखर निर्माण करणारा हंगाम ‘अपघाताचा व नुकसानीचा’ असा ठपका या हंगामावर येऊ नये याची दक्षता घेणे समाजहिताचे आहे.