शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

प्रशिक्षित चालकांची गरज : वाहतूक नियमांची अंमलबजावणी अपघातास आळा घालेल

घन:शाम कुंभार -यड्राव साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीस प्राधान्य असते; परंतु चालकांचा अतिआत्मविश्वास व अल्लडपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपघातात बळी जात असून, अपघाताच्या घटना सुरू आहेत. हे रोखण्यासाठी साखर कारखान्यांसह ट्रॅक्टरमालकांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक नियंत्रण विभागाकडून होणारी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणीच अपघातास आळा घालेल, अन्यथा ‘साखरनिर्मितीचा हंगाम अपघाताचा सिझन’ असे ब्रीदवाक्य होईल. याची दक्षता घेणे सर्वांच्या हिताचे आहे.साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एकाच वेळी जादा वापर केला जातो; परंतु यावरील चालक अप्रशिक्षित व वाहतूक नियमाबाबत अनभिज्ञ व व्यसनी असतात. यामुळे इतरांपेक्षा जादा ऊस वाहतुकीची ईर्षा असल्याने वाहनाची क्षमता व अधिकृत परवानापेक्षा जादा ऊस भरल्याने वेग मर्यादा पाळताना चुका होतात. त्याचा परिणाम अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.वाहनचालकांचे एकाच फेरीत जादा ऊस वाहतूक करण्याच्या प्रयत्नात शेतामध्ये ट्रॉली अडकून पडते. शेतात अडकलेली ट्रॉली बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर किंवा क्रेनचा वापर करावा लागत असल्याने त्याच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांस सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा प्रकारात वाहनांची मोडतोड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहनमालकास बसतो. एकूणच चालकाकडे नसलेला पोक्तपणा व अतिआत्मविश्वास इतरांना नुकसानकारक ठरत आहे.रस्ते वाहतूक नियंत्रण विभागही याकडे लक्ष देत नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतूक विभागाकडून एखाद्या-दुसऱ्या वाहनास रिप्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यापुरताच हा विभाग असल्याचा भास होतो.ट्रॉलीमध्ये परवाना क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, ट्रॅक्टरवर मोठ्याने रेडिओ अथवा गाणी लावू नयेत, वाहनचालक समजदार व प्रशिक्षित असावा, वाहनांच्या मागे रिफ्लेटर असावा, चालक निर्व्यसनी असावा, ट्रॉलीस ब्रेकची सुविधा असावी, याकरिता ट्रॅक्टरमालकासह साखर कारखान्यांनी विशेष लक्ष देणे सामाजिक हिताचे आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे, यामुळेच अपघाताचे प्रमाण घटणार आहे, नाही तर गोड साखर निर्माण करणारा हंगाम ‘अपघाताचा व नुकसानीचा’ असा ठपका या हंगामावर येऊ नये याची दक्षता घेणे समाजहिताचे आहे.