शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

प्रशिक्षित चालकांची गरज : वाहतूक नियमांची अंमलबजावणी अपघातास आळा घालेल

घन:शाम कुंभार -यड्राव साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीस प्राधान्य असते; परंतु चालकांचा अतिआत्मविश्वास व अल्लडपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपघातात बळी जात असून, अपघाताच्या घटना सुरू आहेत. हे रोखण्यासाठी साखर कारखान्यांसह ट्रॅक्टरमालकांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक नियंत्रण विभागाकडून होणारी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणीच अपघातास आळा घालेल, अन्यथा ‘साखरनिर्मितीचा हंगाम अपघाताचा सिझन’ असे ब्रीदवाक्य होईल. याची दक्षता घेणे सर्वांच्या हिताचे आहे.साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एकाच वेळी जादा वापर केला जातो; परंतु यावरील चालक अप्रशिक्षित व वाहतूक नियमाबाबत अनभिज्ञ व व्यसनी असतात. यामुळे इतरांपेक्षा जादा ऊस वाहतुकीची ईर्षा असल्याने वाहनाची क्षमता व अधिकृत परवानापेक्षा जादा ऊस भरल्याने वेग मर्यादा पाळताना चुका होतात. त्याचा परिणाम अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.वाहनचालकांचे एकाच फेरीत जादा ऊस वाहतूक करण्याच्या प्रयत्नात शेतामध्ये ट्रॉली अडकून पडते. शेतात अडकलेली ट्रॉली बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर किंवा क्रेनचा वापर करावा लागत असल्याने त्याच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांस सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा प्रकारात वाहनांची मोडतोड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहनमालकास बसतो. एकूणच चालकाकडे नसलेला पोक्तपणा व अतिआत्मविश्वास इतरांना नुकसानकारक ठरत आहे.रस्ते वाहतूक नियंत्रण विभागही याकडे लक्ष देत नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतूक विभागाकडून एखाद्या-दुसऱ्या वाहनास रिप्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यापुरताच हा विभाग असल्याचा भास होतो.ट्रॉलीमध्ये परवाना क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, ट्रॅक्टरवर मोठ्याने रेडिओ अथवा गाणी लावू नयेत, वाहनचालक समजदार व प्रशिक्षित असावा, वाहनांच्या मागे रिफ्लेटर असावा, चालक निर्व्यसनी असावा, ट्रॉलीस ब्रेकची सुविधा असावी, याकरिता ट्रॅक्टरमालकासह साखर कारखान्यांनी विशेष लक्ष देणे सामाजिक हिताचे आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे, यामुळेच अपघाताचे प्रमाण घटणार आहे, नाही तर गोड साखर निर्माण करणारा हंगाम ‘अपघाताचा व नुकसानीचा’ असा ठपका या हंगामावर येऊ नये याची दक्षता घेणे समाजहिताचे आहे.