शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तोतापुरी, डाळिंबांची आवक वाढली, मेथी, कोथिंबिरीचा दर चढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 11:38 IST

तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देतोतापुरी, डाळिंबांची आवक वाढलीमेथी, कोथिंबिरीचा दर चढाच : कडधान्य बाजार शांत

कोल्हापूर : तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.जून महिना संपत आल्याने मद्रास हापूस पायरीची आवक कमी झाली असून, आता ‘लालबाग’ व ‘नीलम’ आंबे बाजारात दिसू लागले आहेत. त्यांच्या जोडीला तोतापुरी आंब्यांची आवकही सुरू झाली असून, रोज १0 टन तोतापुरी बाजार समितीत येतो; त्यामुळेच फळबाजारासह शहरातील प्रमुख चौकांत तोतापुरीची रेलचेल दिसते.

डाळिंबांची आवक अद्याप कायम आहे. फणस, अननस, पपईची आवक मोठ्या प्रमाणात दिसते. आवक चांगली असल्याने दर मर्यादित राहिले आहेत. लिंबूची मागणी कमी झाल्याने किरकोळ बाजारात १0 रुपयांना पाच ते १0 लिंबू मिळत आहेत.भाजीपाला बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर काहीसे तेजीत आहेत. भेंडी, दोडका ६० रुपये किलो, तर वांगी ४० पासून ६० रुपये किलोपर्यंत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बहुतांश भाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. वरण्याची आवक कमी असल्याने दर चढे राहिले आहेत.

घाऊक बाजारात ७५ रुपये किलो दर असून, गवारीच्या दरात काहीशी वाढ दिसते. कोथिंबिरीची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. घाऊक बाजारात सरासरी २३ रुपये पेंढी असली, तरी किरकोळ बाजारात किमान ३० रुपये मोजावे लागत आहेत.

मक्का कणसाची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात सरासरी २५० रुपये शेकडा असले, तरी किरकोळमध्ये १0 रुपये कणसाचा दर आहे. पालेभाज्यांचे दर वाढले असून, मेथी २० रुपये, पोकळा १५ रुपये पेंढी आहे.पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य बाजार काहीसा शांत दिसतो; त्यामुळे डाळींच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. तांदळाच्या दरात प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांची वाढ दिसते. शेंगांचे दर वाढल्याने शेंगदाणा व शेंगतेलाच्या दरातही वाढ होत आहे.

शेंगदाणा ८० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. येत्या आठवड्याभरात शेंगतेलाचा दर १५0 रुपये ओलांडेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. साखरेचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३२०० रुपये दर असला तरी किरकोळ बाजारात तो ३६०० रुपये आहे.

कांदा-बटाटा स्थिर!कांदा-बटाट्याची आवक थोडी वाढली असून, बाजार समितीत रोज १२ हजार पिशव्यांची आवक होते. घाऊक बाजारात कांदा १३ रुपये, तर बटाटा १५ रुपये किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात थोडी वाढ दिसते. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर