शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

टाटा, कोयनेच्या पाण्याचा अहवाल चुकीचा- कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:50 IST

टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे.

कोल्हापूर  - टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे. या शासन निर्णयासाठी वॉटर आर्मी शासनाला पर्यायी अभ्यास व कृतीगट तयार करणार असल्याची माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व टाटा - कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी सोमवारी दिली आहे.कदम म्हणाले, आपल्या सततच्या आंदोलनानंतर आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि.२ आॅगस्ट २०१८ रोजी कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात वळवण्यात येणारे पाणी टप्प्या-टप्प्याने कमी करण्याकरिता अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीने मुदतीत एकही बैठक घेतली नव्हती. किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या आंदोलनामुळे समितीने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून अगदी घाईघाईने पश्चिमेकडचे पाणी पूर्वेकडे वळवू नये, असा अहवाल सादर केला.या अहवालाबाबत आपण तीव्र आक्षेप घेतला असून हा अहवाल महाराष्टÑासाठी नव्हे तर टाटा कंपनीसाठी तयार केला असून कोणताही व्यापक अभ्यास न करता प्रचलित चर्चेनुसार सादर केला आहे.समितीने शासननिर्णयामधील अनेक वाक्यांचा अर्थबोध लागत नाही, असे लिहिले आहे. अभ्यास समितीचा ढोंगीपणा असून शासननिर्णयातील सर्व वाक्ये अगदी साधी, सरळ आहेत. समितीसाठी एका भाषातज्ज्ञांची नेमणुकीची गरज होती का असा प्रश्न पडावा इतका चुकीचा अर्थ समितीने शासननिर्णयाचा जाणीवपूर्वक लावला आहे.समितीत जलसंपदातील नोकरशहांचा भरणाकदम म्हणाले, शासनाने नेमलेल्या समितीमध्ये राज्यघटना,पर्यावरण, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळींचा समावेश असणे गरजेचे होते; परंतु केवळ जलसंपदा विभागातील नोकरशहांचा भरणा होता. या अहवालात लोकप्रतिनिधी सदस्यांची मतेही विचारात घेतलेली नाहीत. हे सर्व आश्चर्यकारक व हास्यास्पद आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण