शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टाटा, कोयनेच्या पाण्याचा अहवाल चुकीचा- कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:50 IST

टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे.

कोल्हापूर  - टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे. या शासन निर्णयासाठी वॉटर आर्मी शासनाला पर्यायी अभ्यास व कृतीगट तयार करणार असल्याची माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व टाटा - कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी सोमवारी दिली आहे.कदम म्हणाले, आपल्या सततच्या आंदोलनानंतर आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि.२ आॅगस्ट २०१८ रोजी कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात वळवण्यात येणारे पाणी टप्प्या-टप्प्याने कमी करण्याकरिता अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीने मुदतीत एकही बैठक घेतली नव्हती. किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या आंदोलनामुळे समितीने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून अगदी घाईघाईने पश्चिमेकडचे पाणी पूर्वेकडे वळवू नये, असा अहवाल सादर केला.या अहवालाबाबत आपण तीव्र आक्षेप घेतला असून हा अहवाल महाराष्टÑासाठी नव्हे तर टाटा कंपनीसाठी तयार केला असून कोणताही व्यापक अभ्यास न करता प्रचलित चर्चेनुसार सादर केला आहे.समितीने शासननिर्णयामधील अनेक वाक्यांचा अर्थबोध लागत नाही, असे लिहिले आहे. अभ्यास समितीचा ढोंगीपणा असून शासननिर्णयातील सर्व वाक्ये अगदी साधी, सरळ आहेत. समितीसाठी एका भाषातज्ज्ञांची नेमणुकीची गरज होती का असा प्रश्न पडावा इतका चुकीचा अर्थ समितीने शासननिर्णयाचा जाणीवपूर्वक लावला आहे.समितीत जलसंपदातील नोकरशहांचा भरणाकदम म्हणाले, शासनाने नेमलेल्या समितीमध्ये राज्यघटना,पर्यावरण, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळींचा समावेश असणे गरजेचे होते; परंतु केवळ जलसंपदा विभागातील नोकरशहांचा भरणा होता. या अहवालात लोकप्रतिनिधी सदस्यांची मतेही विचारात घेतलेली नाहीत. हे सर्व आश्चर्यकारक व हास्यास्पद आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण