शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’सोबत उद्या बैठक

By admin | Updated: December 1, 2014 00:39 IST

अपूर्ण कामे : आयआरबीच्या प्रतिनिधींना आंदोलकांची धास्ती

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांची माहिती घेणे, केलेल्या कामांचा आढावा घेणे, कामांतील त्रुटी याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींची मंगळवारी (दि.२) कोल्हापुरात बैठक होत आहे. शहरातील अपूर्ण कामांबाबत अशा स्वरूपाची दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याची सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्राव्दारे केली आहे. आंदोलकांच्या धास्तीमुळे ‘आयआरबी’ने ही बैठक पुण्याला घेण्याबाबत प्रयत्न चालविले आहेत.रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातून पलायन केले. एका रात्रीत कोल्हापुरातील कार्यालय पुण्यात हलविले. कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांचा एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण करण्याची व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलने होऊ लागल्यानंतर दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून पलायन केले.टोलविरोधी कृती समितीने रस्त्याचा दर्जा, युटिलिटी शिफ्टिंग, विजेचे दिवे, रस्त्याकडील चॅनेल, अपूर्ण कामे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. ही सर्व कामे करण्याबाबत महापालिकेनेही वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. आयआरबीने तर महापालिकेला पत्र लिहून अपूर्ण कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातारवण नसल्याने काम करण्यास असहमती दर्शविली. त्यामुळेच आयुक्तांनी आयआरबी व महामंडळाच्या प्रतिनिधींना अपूर्ण कामांबाबात दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. केलेल्या कामांचा दर्जा व टोलबाबत आलेल्या तक्रारीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे त्यामुळे सोयीचे होणार आहे. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या धास्तीने महामंडळ किंवा आयआरबीच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरात बैठकीस नकार दिला आहे. दर पंधरा दिवसांनी कोल्हापुरात आढावा बैठक घेण्याबाबत आयुक्त ठाम असल्याने आयआरबी व महामंडळाची गोची झाल्याची चर्चा आहे.