शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

टोल गेला, पैशाचे काय ? बँक गॅरंटीची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

महापौरांनी घेतली महापालिकेत बैठक शहर अभियंत्यांनी दिली माहिती

कोल्हापूर : ‘आयआरबी’ कंपनीचा टोल शासनाने रद्द केला; पण कंपनीने केलेल्या कामाचे अंतिम मूल्यमापन अद्याप झालेले नाही. अपुऱ्या कामांची यादी महानगरपालिकेने शासनाला दिलेली आहे. टोल गेला असला तरी कोणी, किती पैसे द्यायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आलेली बँक गॅरंटीची रक्कम महापालिकेला मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत दिली. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी स्थायी समितीच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनबाबत लाईन बाझार येथील इनर्ट मटेरियल टाकाळा लँडफिल्ड साईट व शुगरमिल परिसरात टाकण्याबाबत परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यास मान्यता मिळताच झुम येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. ‘आयआरबी’चा टोल शासनाने रद्द केला असला तरी कंपनीने केलेल्या कामांचे अंतिम मूल्यमापन अद्याप झालेले नाही. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या ७२ कोटींच्या कामाबाबतचे पालकमंत्र्यांसमोर सादरीकरण केले आहे.बैठकीमध्ये श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास-तीर्थक्षेत्र आराखडा, नगरोत्थान प्रकल्पांतर्गत रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा विभाग स्पॉट बिलिंगबाबत, शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व पाणी गळती, आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.पदाधिकारी, नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांची पूर्तता करून ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर अश्विनी रामाणे यांनी दिल्या. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, छाया पोवार, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, उमा बनछोडे, आदी अधिकारी उपस्थित होते. कळंबा तलावाची पाणी क्षमता वाढणारजलअभियंता मनीष पवार यांनी, कळंबा तलावातील ६० टक्के गाळ काढल्यामुळे २२५ द.लि. पाण्याची क्षमता वाढणार आहे. रंकाळ्याचा विकास आराखडा तयार केला आहे. काळम्मावाडी ते पुईखडी या ५२.४ कि.मी.पैकी १५ कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरामधील १३.५ कि.मी. पैकी १० कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले. तसेच कसबा बावडा येथील सांडपाणी शुद्धिकरण प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. विश्व कंपनी काम करत नसल्याने या कंपनीस दर दिवसा दहा हजार रुपये दंड सुरू आहे.