शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

आजपासून कायदा साक्षरता अभियान

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

अनोखा उपक्रम : गोविंदराव पानसरे यांना वकिलांची कृतिशील आदरांजली

सांगली : पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांनी समाजजागृतीसह नागरिक कायद्याचे साक्षर व्हावेत यासाठी परिश्रम घेतले. पानसरे यांना कृतिशील आदरांजली वाहण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीने येत्या शनिवारपासून वर्षभराकरिता ‘कॉ. गोविंद पानसरे कायदे साक्षरता अभियान’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शहरातील सहा वकिलांची टीम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला व साहाय्य करणार आहे.लोकशाहीप्रधान देशात कायद्याचे राज्य असले तरीही बहुतेकांना कायद्याची फारशी माहिती नसते. परिणामी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हे थांबविण्यासाठी नागरिक ‘कायदा साक्षर’ होणे महत्त्वाचे आहे. गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनाची हाक दिली व त्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबरीने त्यांना कायद्याबाबतही जागृत केले. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या कायद्याची माहिती सामान्यांना व्हावी, या उद्देशाने सांगली जिल्हा सुधार समितीने वर्षभर कायदा साक्षरतेचा जागर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या अभियानाचा कोठेही गाजावाजा करण्यात येणार नसून, प्रत्यक्ष कृतिशील कार्य करण्यावर वकिलांचा भर राहणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीमध्ये ग्रामस्थांना कायद्याची सोप्या भाषेत माहिती देण्यात येणार आहे. दिवाणी, फौजदारी, कामगार कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, सामाजिक व महिलाविषयक कायदे याबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठीही संबंधितांना मोफत सल्ला व साहाय्य करण्यात येणार आहे. नुकताच भूसंपादनविषयी कायदा लोकसभेत मंजूर झाला असला तरी ज्या शेतकऱ्यांना या कायद्याला सामोरे जावे लागणार आहे, त्यांना या कायद्याची माहितीच नाही. कायद्याच्या त्रुटी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहेत. शनिवार, दि. १४ रोजी मिरज तालुक्यातील बिसूर येथून अभियानास प्रारंभ होत आहे. प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांची सोयीची वेळ पाहून कायदा जागर करण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानात अ‍ॅड. राहुल पाटील, अमित शिंदे, वैभव कदम, प्रियांका कस्तुरे, दीपक हेगडे, राहुल कांबळे हे युवा वकील सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विविध क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील कायदेशीर तज्ज्ञदेखील अभियानात सहभागी होण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)गोविंद पानसरे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणारसांगली जिल्हा सुधार समितीचा उपक्रमबिसूर येथे आजपासून उपक्रमास प्रारंभशहरातील सहा वकिलांची टीम कार्यरतप्रत्येक शनिवारी गावा-गावात मार्गदर्शनग्रामस्थांना कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला नागरिकांना ‘कायदा साक्षर’ बनविण्यासाठी प्रयत्न शेतकऱ्यासमोर भूसंपादन कायद्याच्या त्रुटीं मांडणारइतर कायद्यांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारजनजागृती अभियान वर्षभर राबविणारमार्गदर्शक पुस्तिका..सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे सामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या ५० कायदेशीर तरतुदींची मार्गदर्शक पुस्तिका समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. सामान्य माणूस कायदा साक्षर होणे अत्यावश्यक होते. परंतु स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही तशी परिस्थिती नाही. यासाठीच काही युवा वकिलांनी कायदा साक्षरतेचे अभियान हाती घेतले आहे. वास्तविक ही एक चळवळच आहे. - अ‍ॅड. राहुल पाटील, सांगली.