शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ऊस उत्पादकांचे ३०० कोटी कारखान्यांकडे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:07 IST

कोपार्डे : सध्या साखर दर घसरल्याचे कारण पुढे करून हंगामाच्या सुरुवातीला ठरलेला उसाचा एफआरपी + १०० अशा पहिल्या हप्त्याऐवजी २५०० रुपये असा प्रतिटन दर देण्याची सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम २००६/०७ मधील दुसºया हप्त्यापोटी कारखानदारांनी बुडविलेल्या ३०० कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू ...

कोपार्डे : सध्या साखर दर घसरल्याचे कारण पुढे करून हंगामाच्या सुरुवातीला ठरलेला उसाचा एफआरपी + १०० अशा पहिल्या हप्त्याऐवजी २५०० रुपये असा प्रतिटन दर देण्याची सुरुवात केली आहे. यामुळे हंगाम २००६/०७ मधील दुसºया हप्त्यापोटी कारखानदारांनी बुडविलेल्या ३०० कोटी रुपयांची सध्या चर्चा सुरू आहे.गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होताना थोडी खळबळ होते; पण शासन म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील हे मध्यस्थाची बजावत असलेली चोख भूमिका व शेतकरी संघटना, कारखानदार त्याला देत असलेला सामोपचाराचा मान यामुळे सुरळीत हंगाम सुरू होतो; पण अचानक साखरेचे दर गडगडतात आणि ऊस उत्पादकांचे उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी कारखानदारांना यातायात करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यावर्षीही हीच अवस्था झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल होते. ते आज २८०० ते २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरलेले आहेत. यामुळे बँंकांनी पतपुरवठा करण्यासाठी हात आखडता घेतल्याने कारखानदारांना एफआरपी+१०० असा पहिला हप्ता देण्यासाठी पैशांची उपलब्धता होत नसल्याने यावर्षी त्याऐवजी २५०० रुपये देण्यासाठी सुरुवात केली आहे.नेमकी अशीच आर्थिक परिस्थिती हंगाम २००६/०७ मध्ये हंगामाच्या सुरुवातीला झाली होती. यावेळी हंगामाची सुरुवात असल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने ऊस उत्पादकांचेच यात नुकसान होणार असल्याने शेतकरी संघटनांनी मिळतेजुळते घेण्यासाठी ९००+३८० असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात ९०० पहिला, तर ३८० रुपये हंगाम संपल्यानंतर देण्याचे ठरले. यावेळी मध्यस्थी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी भूमिका बजावली. तर दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक, खा. राजू शेट्टी व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. मात्र, हंगाम संपला तरी हा ३८० रुपयांचा दुसरा हप्ता दहा वर्षे झाली तरी अजून शेतकºयांना मिळालेला नाही. या हंगामात सर्वसाधारण ९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडून करण्यात आले होते.या उसाचे ३८०प्रमाणे दुसºया हप्त्याची रक्कम ३४० कोटींच्या घरात आहे. आजही हे हंगाम २००६/७ मधील ३४० कोटी रुपये कारखानदारांच्या बटव्यात आहेत.सर्वाधिक रक्कम वारणा व जवाहरकडे थकीत२००६/0७ च्या हंगामात वारणा कारखान्याने १२ लाख ५५ हजार ६७९ मे. टन उसाचे गाळप केले. यापोटी ४७ कोटी ७१ लाख ५८ हजार २०रुपये सर्वाधिक थकीत होते. तर त्या पाठोपाठ जवाहर कारखान्याने ११ लाख ७३ हजार ६७६मे. टन ऊस गाळप केले होते. यापोटी ४४ कोटी ५९ लाख ९६ हजार ८८० रुपये थकीत आहेत.हंगाम २००६-०७ मध्ये ३८०च्या दुसºया हप्त्यापोटीचे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे आजअखेर थकीतकारखान्याचे नाव हंगामात ऊस गाळप ३८० च्या हप्त्यापोटी(लाख मे. टन) थकीत रक्कम (कोटीत)भोगावती, परिते ५,४५,७२४ २०,७३,७५,१२०मंडलिक, हमीदवाडा ५,२१,४१४ १९,८१,३७,३२०जवाहर, हुपरी ११,७३,६७६ ४४,५९,९६,८८०दूधगंगा-वेदगंगा, बिद्री ६,४२,९०० २४,४३,०२,०००वारणा कारखाना १२,५५,६७९ ४७,७१,५८,०२०छ. राजाराम, बावडा ३,७५,३४६ १४,२६,३१,४८०दत्त, शिरोळ १०,२५,२८० ३८,९६,०६,४००पंचगंगा, इचलकरंजी ६,४३,१९३ २४,४४,१३,३४०शरद, नरंदे ४,१४,७३३ १५,७५,९८,५४०डी. वाय. पाटील ३,५५,१५३ १३,४९,५८,१४०दत्त, आसुर्ले-पोर्ले १,३१,००० ४,९७,८०,०००गडहिंग्लज ३,७८,३३२ १४,३७,६६,१८०कुंभी-कासारी, कुडित्रे ५,१४,१६२ १९,५३,८१,५६०गुरुदत्त, टाकळी ५,६९,९८० २१,६५,९२,४००दौलत, चंदगड ५,१७,६९५ १९,६७,२४,१००उदयसिंह गायकवाड, बांबवडे १,९६,२६३ ७,४५,७९,९४०