शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘तिलारी’च्या खर्चात ५० पट वाढ

By admin | Updated: June 26, 2017 00:57 IST

‘तिलारी’च्या खर्चात ५० पट वाढ

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्याने तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा खर्च तब्बल ५० पट वाढला आहे. या प्रकल्पास १९७८-७९ च्या दरसूचीवर आधारित ४५ कोटी रुपयांस शासनाने मूळ मान्यता दिली होती. त्यात आता वाढ होऊन परवाच्या २१ जूनला जलसंपदा विभागानेच २४९६ कोटी ७८ लाखांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी दिली. आता हा प्रकल्प २०१८-१९ पर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा शासनाने दिला आहे.तिलारी नदीवरील तिलारीवाडी (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे बांधण्यात आलेला महाराष्ट्र व गोवा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो. प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्णातील तिलारीवाडी गावच्या वरच्या बाजूस धरण बांधून डाव्या बाजूला एक कालवा (डावा तीर कालवा) काढण्यात आला आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ४६२ कोटी १७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील ६ हजार ६७६ हेक्टर क्षेत्र व गोव्यातील डिचोली, पेडणे व बारदेश तालुक्यातील १४ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पास १९७८-७९ मध्ये ४५ कोटी २० लाख इतक्या किमतीस मंजुरी दिली होती. त्यात पुढे १९९३-९४ च्या दरसूचीवर ४८८ कोटीस प्रथम सुधारित मंजुरी दिली. त्यानंतर १९९९-२००० मध्ये ९५२ कोटी ५४ लाखास दुसरी सुधारित तर २००५-०६ मध्ये १३९० कोटी तिसऱ्यांदा वाढीव मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या हिश्याची रक्कम ९८९ कोटी ५९ लाख तर गोव्याची ४०० कोटी ४५ लाख इतकी आहे. आता हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पूर्ण करण्याचे नियोजन आहे.तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर दरसूचीत वाढ झाल्याने,भूसंपादन खर्चात वाढ, प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये बदल व प्रकल्प अहवालातील अपुऱ्या तरतुदी यामुळे प्रकल्प किमतीत वाढ झाल्याचे शासन म्हणते; परंतु ३९ वर्षांपूर्वी पहिली मंजुरी दिलेल्या या प्रकल्पात अजून किती बदल केले जाणार आणि अपुऱ्या तरतुदीमुळे तो अर्धवट राहणार हेच न उलगडणारे कोडे आहे. वाढीव सुधारित मान्यतेनुसार २०१३-१४ च्या दरसूचीवर(म्हणजे त्यालाही आता तीन वर्षे होत आली) आधारित महाराष्ट्राच्या वाट्याला १६६७ कोटी (प्रत्यक्ष कामावर १३९५ कोटी) तर गोवा राज्यातील कामांकरिता ८२९ कोटी इतका खर्च होणार आहे. महत्त्वाचे बदलया प्रकल्पातील वितरण व्यवस्थेची कामे बंद नलिकेद्वारे करण्यात येणार आहेत.अतिरिक्त आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा प्रकल्पात समावेश नकोछोटे लाभक्षेत्र निश्चित करून हाफ राऊंड सिमेंट शेतचाऱ्यांचा पथदर्शी कार्यक्रम राबवानिर्मित सिंचन क्षेत्र व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र यामध्ये तफावत आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्नकराकालव्याची व वितरण प्रणालीची कामे प्राधान्याने करासुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्पामध्ये झालेल्या गैरव्यवहारास मंजुरी असे नव्हे.