शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

झटपट ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीने इतिहासाचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:26 IST

सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु

ठळक मुद्दे विश्वास पाटील यांचे प्रतिपादन : शिवाजी तरुण मंडळातर्फे आयोजित व्याख्यान

कोल्हापूर : जादा पैशांच्या मोहात कमी वेळेत झटपट ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करून इतिहासाचे तीन-तेरा वाजविण्याचे काम होत आहे. त्यामुळे मूळ इतिहास समोर येत नाही. त्यासाठी अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुरेसा वेळ व इतिहासाचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ‘पानिपत’कार लेखक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठ्यांनी तब्बल २५ वर्षे दिल्लीवर भगवे निशाण फडकाविले होते, असेही त्यांनी सांगितले.

उभा मारुती चौक, शिवाजी पेठ येथे शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘पानिपतच्या लढ्याची रोमांचकारी शौर्यगाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक व्ही. बी. पाटील होते. प्रमुख उपस्थिती मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव, प्राचार्य व्ही. एम. पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, चंद्रकांत साळोेखे, अशोकराव साळोखे, अजित नरके, रवींद्र साळोखे, रोहित मोरे, सुरेश जरग, अनिल देशपांडे, आदींची होती.

विश्वास पाटील म्हणाले, पानिपतची लढाई समजून घेताना राष्टÑाचा नकाशासमोर आणावा लागेल; कारण त्यावेळी मराठ्यांचा दबदबा सिंधूपासून रामेश्वर व बंगालपर्यंत होता.पानिपतची लढाई ही मुस्लिमविरोधी नव्हती; तसेच ती ब्राह्मणांचीही नव्हती; कारण त्यावेळी मराठा साम्राज्यात

सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु तत्कालीन संदर्भ आणि वस्तुस्थिती पाहता त्यांमध्ये फारसे तथ्य दिसत नाही.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहासcinemaसिनेमा