शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:37 IST

कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.

ठळक मुद्देपन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकेचाही गौरव६ मार्चला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

कोल्हापूर : कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.गृह आणि नागरी मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या या मिशनअंतर्गत कोल्हापूरसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील २७ पालिकांना हे नामांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये राज्यातील १३ पालिकांना नामांकन मिळाले आहे. मात्र, कोल्हापूरचा समावेश नाही.या मिशनअंतर्गत ३१ जानेवारीला स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले होते. यात कचरामुक्त शहर ठेवण्यासह कचऱ्यावर प्रक्रिया, सांडपाण्याचे व्यवस्थापन, घर टू घर भेट देऊन होणारे संकलन आदीची माहिती केंद्रीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करून घेतली होती. या मोहिमेंतर्गत ४२३७ स्थानिक स्वराज्य संस्था, ६४ लाख प्रत्यक्ष मिळालेले प्रतिसाद आणि ४ कोटी समाजमाध्यमावरील संदेश यातून हे नामांकन दिले गेले आहे.नव्या आयुक्तांना मिळणार मानमाजी आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कालावधीत शहरात स्वच्छ भारत मोहीम ताकदीने राबविण्यात आली. पण त्यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागेवर येणारे नवे आयुक्त एम. एस. कलशेट्टी यांना पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिला मोठा पुरस्कार स्वीकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे.प्रशासकीय अनास्थाहे नामांकन मिळाल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, तथापि नेहमीप्रमाणे यालाही प्रशासकीय अनास्थेचाच अनुभव आला. महापालिकेत जनसंपर्क विभाग वारंवार आरोग्य विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती मागवून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचेही फोन स्वीच आॅफ असल्याने अतिरिक्त माहितीही उपलब्ध होऊ शकली नाही.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर