शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:37 IST

कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.

ठळक मुद्देपन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकेचाही गौरव६ मार्चला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

कोल्हापूर : कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.गृह आणि नागरी मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या या मिशनअंतर्गत कोल्हापूरसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील २७ पालिकांना हे नामांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये राज्यातील १३ पालिकांना नामांकन मिळाले आहे. मात्र, कोल्हापूरचा समावेश नाही.या मिशनअंतर्गत ३१ जानेवारीला स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले होते. यात कचरामुक्त शहर ठेवण्यासह कचऱ्यावर प्रक्रिया, सांडपाण्याचे व्यवस्थापन, घर टू घर भेट देऊन होणारे संकलन आदीची माहिती केंद्रीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करून घेतली होती. या मोहिमेंतर्गत ४२३७ स्थानिक स्वराज्य संस्था, ६४ लाख प्रत्यक्ष मिळालेले प्रतिसाद आणि ४ कोटी समाजमाध्यमावरील संदेश यातून हे नामांकन दिले गेले आहे.नव्या आयुक्तांना मिळणार मानमाजी आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कालावधीत शहरात स्वच्छ भारत मोहीम ताकदीने राबविण्यात आली. पण त्यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागेवर येणारे नवे आयुक्त एम. एस. कलशेट्टी यांना पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिला मोठा पुरस्कार स्वीकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे.प्रशासकीय अनास्थाहे नामांकन मिळाल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, तथापि नेहमीप्रमाणे यालाही प्रशासकीय अनास्थेचाच अनुभव आला. महापालिकेत जनसंपर्क विभाग वारंवार आरोग्य विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती मागवून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचेही फोन स्वीच आॅफ असल्याने अतिरिक्त माहितीही उपलब्ध होऊ शकली नाही.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर