शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:01 IST

पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : नुसत्या पदव्या घेऊन आजचा तरुण स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाही. त्यासाठी त्याला व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण मिळायला हवे, या भावनेतून पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. कर्मवीर अण्णांच्याबद्दल कृतज्ञता आणि सामाजिक उतराई या भावनेतून अनगोळ दाम्पत्याने हा निर्णय घेतला. या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये होते. या मोक्याच्या जागेवर ‘रयत’तिथे स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करीत आहे.डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांचे वडील सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दचे. बाळगोंड पाटील असे त्यांचे नाव. ते एक्साईज सुपरिंटेंडेंट होते. त्यांना सात बहिणी व तीन भाऊ. त्यांतील मालती या सर्वांत मोठ्या व कोल्हापूरच्या डॉ. साधना झाडबुके या लहान बहीण. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाचा समाजाने फारसा विचार केला नव्हता, तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालतीताई शिकल्या. जे. जे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून त्या पदवीधर झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या त्या प्रमुख होत्या. स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या पतींना पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील पायोनिअर मानले जाते. गव्हर्न्मेंट कॉलेजच्या पहिल्या बॅचचे ते स्कॉलर होते. त्यांना सोलर ऊर्जेमध्ये खूपच रस होता. त्यासंबंधीचे कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांनी ही जागा १९९८ ला घेतली. परंतु वृद्धत्वामुळे ते शक्य झाले नाही; म्हणून कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांना वाटत होते. पतीचे हे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. कर्मवीर अण्णांची हीरकमहोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त ही जागा दिल्याबद्दल डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच सत्कार करण्यात आला.कर्मवीर अण्णांच्यामुळे त्या काळी आमचे शिक्षण झाले; त्यामुळे त्याबद्दलची कृतज्ञता व तरुण मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे यासाठी स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करावे म्हणून ‘रयत’ला ही जागा दिली. आमचे दान सत्पात्री लागल्याचा आनंद आहे.- डॉ. मालती अनगोळ, पुणे

टॅग्स :Puneपुणे