शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:01 IST

पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : नुसत्या पदव्या घेऊन आजचा तरुण स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाही. त्यासाठी त्याला व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण मिळायला हवे, या भावनेतून पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. कर्मवीर अण्णांच्याबद्दल कृतज्ञता आणि सामाजिक उतराई या भावनेतून अनगोळ दाम्पत्याने हा निर्णय घेतला. या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये होते. या मोक्याच्या जागेवर ‘रयत’तिथे स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करीत आहे.डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांचे वडील सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दचे. बाळगोंड पाटील असे त्यांचे नाव. ते एक्साईज सुपरिंटेंडेंट होते. त्यांना सात बहिणी व तीन भाऊ. त्यांतील मालती या सर्वांत मोठ्या व कोल्हापूरच्या डॉ. साधना झाडबुके या लहान बहीण. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाचा समाजाने फारसा विचार केला नव्हता, तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालतीताई शिकल्या. जे. जे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून त्या पदवीधर झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या त्या प्रमुख होत्या. स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या पतींना पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील पायोनिअर मानले जाते. गव्हर्न्मेंट कॉलेजच्या पहिल्या बॅचचे ते स्कॉलर होते. त्यांना सोलर ऊर्जेमध्ये खूपच रस होता. त्यासंबंधीचे कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांनी ही जागा १९९८ ला घेतली. परंतु वृद्धत्वामुळे ते शक्य झाले नाही; म्हणून कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांना वाटत होते. पतीचे हे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. कर्मवीर अण्णांची हीरकमहोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त ही जागा दिल्याबद्दल डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच सत्कार करण्यात आला.कर्मवीर अण्णांच्यामुळे त्या काळी आमचे शिक्षण झाले; त्यामुळे त्याबद्दलची कृतज्ञता व तरुण मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे यासाठी स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करावे म्हणून ‘रयत’ला ही जागा दिली. आमचे दान सत्पात्री लागल्याचा आनंद आहे.- डॉ. मालती अनगोळ, पुणे

टॅग्स :Puneपुणे