शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

तीन महिन्यांच्या नातीचा आजीकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:47 AM

कोल्हापूर : सुनेला व आजारी तीन महिन्यांच्या नातीला बाहेरून दूधपावडर आणि औषधे आणण्याचा खर्च पेलवत नसल्याच्या रागातून एकुलत्या नातीचा गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना यादवनगरमध्ये शनिवारी (दि. ६) उघडकीस आली. शिफाना शब्बीर मुल्ला (वय ३ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आजी मोहबतबी आदम मुल्ला ...

कोल्हापूर : सुनेला व आजारी तीन महिन्यांच्या नातीला बाहेरून दूधपावडर आणि औषधे आणण्याचा खर्च पेलवत नसल्याच्या रागातून एकुलत्या नातीचा गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना यादवनगरमध्ये शनिवारी (दि. ६) उघडकीस आली. शिफाना शब्बीर मुल्ला (वय ३ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आजी मोहबतबी आदम मुल्ला (वय ४५) हिला अटक केली.अधिक माहिती अशी, यादवनगर येथील एम. एस. ई. बी. रोड, कोटीतीर्थ वसाहत, एच. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांच्या घरात संशयित मोहबतबी मुल्ला, त्यांचा मुलगा शब्बीर मुल्ला, सून शहनाज, साठ वर्षांची आई असे चौघेजण राहतात. शब्बीर हा फुलेवाडी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. त्यांना तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. तिचे नाव शिफाना ठेवले. साडेआठ महिन्यांमध्ये प्रसूती झाल्याने शिफाना प्रकृतीने कमजोर होती. सासू मोहबतबी ही सून शहनाजला तुझे दूध कमी झाले आहे. तुला खायला घालून काय उपयोग, मुलगा शब्बीर याचे आम्ही दुसरे लग्न करणार आहोत असे म्हणून घालून-पाडून बोलत होती.गेल्या तीन चार दिवसांपासून बालिका शिफाना हिला सर्दी व ताप असल्याने नणंद काजल अब्दुलरशीद नेरली व शेजारील महिलेला घेऊन ती राजारामपुरी सातवी गल्ली येथील एका दवाखान्यात घेऊन गेली होती. तेथून परत आल्यानंतर सासू पुन्हा बोलू लागली. मुलगीला बरे नसल्याने शब्बीर तीन दिवस कामावर गेला नाही. ५ आॅक्टोबरला रात्री साडेनऊच्या सुमारास बालिका साडीच्या झुल्यात झोपली होती. ६ आॅक्टोबरला सकाळी शहनाज मुलीला दूध पाजून बिल्डिंगच्या खाली पिण्याचे पाणी भरण्याकरिता गेली. मुलगी झुल्यात खेळत होती. नंतर ती अंघोळीकरिता बाथरूममध्ये गेली. त्यानंतर शब्बीर हे मुलीला हातामध्ये घेऊन काय झाले, ती उठत का नाही असे म्हणत बाहेरील खोलीत आले. शहनाज हिने पाहिले असता शिफान निपचित पडली होती. तिच्या गळ्यावर जखमेचा व्रण व त्यावर शाई लावलेली दिसली. शाई कोणी लावली असे तिने विचारले असता सासूने आपण लावल्याचे सांगितले. त्यानंतर पती शब्बीर व सासू मोहबतबी हे सीपीआर रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी बालिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालिकेचे बागल चौक येथील स्मशानभूमीत दफन केले.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नशवविच्छेदन विभागात बालिकेला आणल्यानंतर डॉ. निखिल जगताप आणि डॉ. गुरुनाथ दळवी, डॉ. वसीम मुल्ला यांना शंका आली. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर चव्हाण यांना बोलावून घेतले. त्यांना हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे सांगितले. त्यानंतर खुनाला वाचा फुटली. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता आजी मोहबतबी हिने आर्थिक विवंचनेतून खुनाची कबुली दिली.