शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदार ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 17:17 IST

भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते,

ठळक मुद्देआवाडे, कोरे, यड्रावकर यांचा दूरदृष्टीने निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्यातून निवडून आलेले प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे यांनी सध्या ज्यांना पाठिंबा दिला आहे. तोच कायम ठेवला जाईल, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते, अशी चर्चा आहे; परंतु आवाडे आता गडबड करणार नाहीत असे दिसते; कारण त्यांना सध्या मुंबईपेक्षा दिल्लीतील सत्ता महत्त्वाची आहे; कारण वस्त्रोद्योगाशी संबंधित बहुतांशी निर्णय हे दिल्लीतूनच होत असल्याने ते भाजपसमवेत राहून दिल्लीतील वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे करून घेण्यावर भर देतील, असे सांगितले जाते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत असली तरी बंड करून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सत्ता येणार असल्याने आधीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे; मात्र त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. आता तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे संयुक्त सरकार येणार असल्याने यड्रावकर यांना काम करताना फार अडचणी येणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

राहिता राहिला प्रश्न आमदार विनय कोरे यांचा. त्यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातमहायुतीचा भागीदार पक्ष म्हणून प्रवेश केला आणि विधासभेला भाजपची ‘बी’टीम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सरकार स्थापन करत असताना कोरे हे तातडीने भाजपची साथ सोडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे; मात्र ज्या पद्धतीने हे सरकार बनत आहे, ते पाहता कोरे यांच्यासारखा नेता गडबडीने कोणताही निर्णय न घेता संयमाची भूमिका घेईल, असेच सध्या दिसून येत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण