शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदार ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 17:17 IST

भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते,

ठळक मुद्देआवाडे, कोरे, यड्रावकर यांचा दूरदृष्टीने निर्णय

कोल्हापूर : जिल्ह्यातून निवडून आलेले प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे यांनी सध्या ज्यांना पाठिंबा दिला आहे. तोच कायम ठेवला जाईल, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते, अशी चर्चा आहे; परंतु आवाडे आता गडबड करणार नाहीत असे दिसते; कारण त्यांना सध्या मुंबईपेक्षा दिल्लीतील सत्ता महत्त्वाची आहे; कारण वस्त्रोद्योगाशी संबंधित बहुतांशी निर्णय हे दिल्लीतूनच होत असल्याने ते भाजपसमवेत राहून दिल्लीतील वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे करून घेण्यावर भर देतील, असे सांगितले जाते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत असली तरी बंड करून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सत्ता येणार असल्याने आधीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे; मात्र त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. आता तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे संयुक्त सरकार येणार असल्याने यड्रावकर यांना काम करताना फार अडचणी येणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

राहिता राहिला प्रश्न आमदार विनय कोरे यांचा. त्यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातमहायुतीचा भागीदार पक्ष म्हणून प्रवेश केला आणि विधासभेला भाजपची ‘बी’टीम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सरकार स्थापन करत असताना कोरे हे तातडीने भाजपची साथ सोडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे; मात्र ज्या पद्धतीने हे सरकार बनत आहे, ते पाहता कोरे यांच्यासारखा नेता गडबडीने कोणताही निर्णय न घेता संयमाची भूमिका घेईल, असेच सध्या दिसून येत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण