शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2025 19:50 IST

कंपनी कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा, कार्यपद्धतीवर प्रश्न

उद्धव गोडसेकोल्हापूर : पाइपलाइनने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अत्यंत जोखमीचे काम प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर सोपवून त्या कामाची वेळोवेळी खातरजमा करण्याची जबाबदारी एचपी ऑईल गॅस आणि त्यांच्या ठेकेदार कंपन्यांची होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पाइपलाइन जोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा कळंब्यातील भोजणे कुटुंबीयांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड व ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील घरांमध्ये पाइपलाइनने गॅस पुरवठा करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. शहरात जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकणे, मीटर आणि रेग्युलेटर जोडून देण्याचे काम कंपनीने पुण्यातील सीतामाता कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले आहे. तर या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी इडिप्लस इंजिनीअरिंग ग्लोबल प्रा. लि. कंपनीला दिली आहे.२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सीतामाता कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली याने अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाइपलाइनची जोडणी केली. मीटर जोडण्यापूर्वी पाइपलाइनला एन्डकॅप जोडली जाते. एन्डकॅप न जोडताच तो निघून गेला आणि मुख्य गॅस वाहिनीतून पुरवठा सुरू केला. हीच चूक दुर्घटनेला कारणीभूत ठरली. या एका चुकीने तिघांचा जीव गेला.

गंध नसल्याने समजलेच नाहीपाइपलाइनद्वारे येणाऱ्या गॅसला गंध नाही. त्यामुळे त्याची गळती झाल्याचे समजत नाही. भोजणे यांच्या घरात असेच घडले. वास येत नसल्याने गळती सुरू असल्याचे समजलेच नाही. यातच पावसामुळे घराच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा बंद असल्याने तिन्ही खोल्यांमध्ये गॅस साठला. रात्री घरातील लाइट बंद करताना अचानक प्रचंड स्फोट होऊन शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे चौघे गंभीर जखमी झाले.कनेक्शन घेण्यास टाळाटाळदुर्घटनेनंतर कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कळंब्यातील मनोरमा कॉलनीत बहुतांश रहिवाशांनी कनेक्शन नाकारले आहे. काही कुटुंबांनी जोडणी केलेले साहित्य काढून घेण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

गावाकडे जाण्याच्या घाईने जोडणीगणेशोत्सवासाठी कोकणातील देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या मूळ गावी जाण्याचे नियोजन भोजणे कुटुंबीयांनी केले होते. पुन्हा घर बंद असल्याने जोडणी राहून जाईल, या विचारातून त्यांनी २५ ऑगस्टला जोडणी केली. त्यानंतर अवघ्या चार तासांतच दुर्घटना घडली.