शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2025 19:50 IST

कंपनी कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा, कार्यपद्धतीवर प्रश्न

उद्धव गोडसेकोल्हापूर : पाइपलाइनने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अत्यंत जोखमीचे काम प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर सोपवून त्या कामाची वेळोवेळी खातरजमा करण्याची जबाबदारी एचपी ऑईल गॅस आणि त्यांच्या ठेकेदार कंपन्यांची होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पाइपलाइन जोडणाऱ्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा कळंब्यातील भोजणे कुटुंबीयांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड व ऑईल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील घरांमध्ये पाइपलाइनने गॅस पुरवठा करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. शहरात जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकणे, मीटर आणि रेग्युलेटर जोडून देण्याचे काम कंपनीने पुण्यातील सीतामाता कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले आहे. तर या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी इडिप्लस इंजिनीअरिंग ग्लोबल प्रा. लि. कंपनीला दिली आहे.२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सीतामाता कन्स्ट्रक्शनचा कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली याने अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाइपलाइनची जोडणी केली. मीटर जोडण्यापूर्वी पाइपलाइनला एन्डकॅप जोडली जाते. एन्डकॅप न जोडताच तो निघून गेला आणि मुख्य गॅस वाहिनीतून पुरवठा सुरू केला. हीच चूक दुर्घटनेला कारणीभूत ठरली. या एका चुकीने तिघांचा जीव गेला.

गंध नसल्याने समजलेच नाहीपाइपलाइनद्वारे येणाऱ्या गॅसला गंध नाही. त्यामुळे त्याची गळती झाल्याचे समजत नाही. भोजणे यांच्या घरात असेच घडले. वास येत नसल्याने गळती सुरू असल्याचे समजलेच नाही. यातच पावसामुळे घराच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा बंद असल्याने तिन्ही खोल्यांमध्ये गॅस साठला. रात्री घरातील लाइट बंद करताना अचानक प्रचंड स्फोट होऊन शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे चौघे गंभीर जखमी झाले.कनेक्शन घेण्यास टाळाटाळदुर्घटनेनंतर कंपनीची कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कळंब्यातील मनोरमा कॉलनीत बहुतांश रहिवाशांनी कनेक्शन नाकारले आहे. काही कुटुंबांनी जोडणी केलेले साहित्य काढून घेण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

गावाकडे जाण्याच्या घाईने जोडणीगणेशोत्सवासाठी कोकणातील देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या मूळ गावी जाण्याचे नियोजन भोजणे कुटुंबीयांनी केले होते. पुन्हा घर बंद असल्याने जोडणी राहून जाईल, या विचारातून त्यांनी २५ ऑगस्टला जोडणी केली. त्यानंतर अवघ्या चार तासांतच दुर्घटना घडली.