शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गाढवाच्या हल्ल्यात तिघे जखमी, गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 15:43 IST

नागरिकांतून संताप

गांधीनगर : येथे गाढवाच्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास विक्रम हायस्कूलच्या पटांगणात घडली. लक्ष्मण देऊ कुसाळे (वय ७५) गोपीचंद वरूमल कामरा (५२, दोघे रा. वळीवडे, ता. करवीर) व मयुरी कुमार जाधव (११, पोवार मळा, उचगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गांधीनगर वळीवडे परिसरात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार जनावरांच्या उपद्रवामुळे अनेकजण जखमी होत आहेत. नागरिकांनी वेळोवेळी गांधीनगर, वळीवडे ग्रामपंचायतीला कळवूनही त्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे की काय?, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले आहेत. काही दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ जण जखमी झाले होते. त्या कुत्र्यांचा बंदोबस्तही केलेला नाही.गांधीनगर परिसरात लहान मुले, वृद्ध फिरत असतात. त्यांना या कुत्र्यांच्या आणि गाढवांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गांधीनगर आणि वळीवडे ग्रामपंचायत प्रशासनाने हद्दीत मोकाट फिरणाऱ्या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा आणि संबंधित गाढव मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर