शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

Kolhapur: गव्याची कारला धडक; राधानगरी येथे तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:48 IST

गव्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाय योजनाची गरज 

गौरव सांगावकर राधानगरी : निपाणी-देवगड राज्यमार्गावर राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्या समोर सकाळच्या सुमारास बिथरलेल्या गव्याने अचानकपणे कोकणाकडे जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील तिघेजण जखमी झाले. निलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग), महेश श्रीकांत पाटील, आकाश महेश पाटील (दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमीची नावे आहेत. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.निलेश मर्गज, महेश पाटील, आकाश पाटील हे तिघे गाडी क्रमांक (एम एच ०९ जीएम ०७६२)मधून कोकणात निघाले होते. दरम्यान, राधानगरी पासून हाकेच्या अंतरावर सांगावकर मळ्यासमोर गव्याने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडकेत कारमधील तिघे जखमी झाले तर गाडीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी वनपाल सूर्यकांत गुरव यांनी भेट देऊन जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनविभागाकडून ठोस उपाय योजनेची गरजया आधी ही गव्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. राधानगरी तहसील कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर हा मळा आहे. या परिसरात मानवी वस्तीत गव्याचा वावर असतो. गव्यांकडून वारंवार हल्ले होत असतात. हे हल्ले थांबविण्याकरीता वनविभागा कडून ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. जंगलातील पाणवटे आटले आहेत. उन्हामुळे पाण्याच्या शोधात गवे मानवी वस्तीत येतात. मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांबरोबर आत्ता पर्यटकांना देखील गव्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforest departmentवनविभाग