शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

राजेंद्रनगरमध्ये तीन झोपड्या आगीच्या भक्षस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:40 IST

राजेंद्रनगर येथील तीन झोपडपट्टींना अचानक विद्युत शॉर्ट सर्किटने आग लागून त्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. दोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देराजेंद्रनगरमध्ये तीन झोपड्या आगीच्या भक्षस्थानीदोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून खाक : पाच लाखांचे नुकसान

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील तीन झोपडपट्टींना अचानक विद्युत शॉर्ट सर्किटने आग लागून त्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. दोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसरात घबराट पसरली. भर वस्तीत लागलेल्या आगीची वर्दी मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तीन बंबद्वारे आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.अधिक माहिती अशी, राजेंद्रनगर झोपडपट्टीच्या भरवस्तीमध्ये शंकर किसन बिरवे यांचे घर आहे. किराणा दुकान आणि दोन दुचाकी घरामध्ये होत्या. सर्वजण साखर झोपेत असताना अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसल्याने बिरवे कुटुंबीय आरडाओरड करीत जीवाच्या भीतीने बाहेर पळत आले. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोक बाहेर पळत आले.

बघता...बघता बिरवे यांचे संपूर्ण घर आगीने ओढले. आजूबाजूच्या लोकांनी घरातील पाणी मिळेल त्या भांड्याने मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीची धग मोठी असल्याने पुढे जाणे धोक्याचे होते.

बिरवे यांच्या घराला लागून भरत रघुनाथ सोनटक्के, रमेश अर्जुन लांबे यांची घरे आहेत. त्यांनाही आगीने ओढले. या तिन्ही घरांतील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. बिरवे यांच्या दोन दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या.

येथील नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलास वर्दी दिली. जवान दत्तात्रय जाधव, वामन चवरे, दिगंबर चव्हाण, संजय पाटील, शिवाजी नलवडे, नीलेश शिनगारे, मोहसीन पठाण, पवन कांबळे, संभाजी डफळे, आदींनी घटनास्थळी धाव घेत तीन पाण्याच्या बंबद्वारे आग विझविली.कुटुंबीय सैरभैरआगीमध्ये तिन्ही कुटुंबीयांचा निवारा नाहीसा झाल्याने सैरभैर झाले आहेत. प्रापंचिक साहित्यही जळून खाक झाले. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवितात. पुन्हा नव्याने झोपडपट्टीवजा घर उभा करण्याची परिस्थिती त्यांची नाही. डोळ्यासमोर घर नाहिसे झाल्याने तिन्ही कुटुंबीयांतील लोक अश्रू ढाळत आहेत. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्पुरता आपल्या घरी आसरा दिला आहे.

 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर