शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

तीन कर्ते पुरुष गेले, घर उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कुटुंब प्रमुख पती-पत्नी दोघंही शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, दोन्ही मुलांना चांगली नोकरी, मुलगी, सुना, नातवंडे यांनी घर ...

कोल्हापूर : कुटुंब प्रमुख पती-पत्नी दोघंही शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, दोन्ही मुलांना चांगली नोकरी, मुलगी, सुना, नातवंडे यांनी घर कसं आनंदानं भरलेलं, सुखा-समाधानानं फुललेलं. सगळं कसं मनासारखं चाललं होतं. पण, या आनंदी गोकुळाला कोरोनाचं ग्रहण लागलं आणि एका महिन्याच्या आतच अचानक एखाद्या वादळानं घर उद्ध्वस्त व्हावं तसं झालं. घरातील तीन कर्ते पुरुष गेले. घर उघड्यावर पडले. सानेगुरुजी हौसिंग सोसायटीमधील म्हेतर कुटुंबावर कोरोनाने हा घाला घातला आहे.

शिवाजीराव एकनाथ म्हेतर (वय ७८) महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी विजया (वय ६५) या सुद्धा प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत हा दि.२ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्याला सानेगुरुजी येथील मैत्रांगण कोविड सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले. पुढे दि. ८ मे रोजी शिवाजीराव यांना कोरोनाने गाठलं. पाठोपाठ त्यांच्या पत्नी विजया यांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. दोघांनाही कसलीच लक्षणं नव्हती, तरीही खबरदारी म्हणून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुटुंबावरील संकट आणि कोरोनाचे भय इथंच संपलं नाही तर दिवसागणिक वेगाने वाढत गेले. शिवाजीराव यांचा मुलगा श्रीकांत व मुलगी वैशाली यांनाही कोराेनाची लागण झाली. श्रीकांत यास राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात, तर वैशाली घरीच राहून उपचार घेतले. एका घरातील पाच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे अन्य कुटुंबीय, नातेवाईकांची प्रचंड धावपळ उडाली. कोरोनामुळे शिवाजीराव, प्रशांत, श्रीकांत यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि म्हेतर कुटुंबावर एक एक आघात होत गेले. शिवाजीराव यांचे दि. १२ मे रोजी, तर प्रशांत यांचे दि. १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर, गुरुवारी (दि.२७ मे) श्रीकांतचे निधन झाले.

एकाच घरातील तीन कर्त्या पुरुषांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होणे या म्हेतर कुटुंबीयांवर ओढवलेल्या वेदनादायी प्रसंगाने परिसरातील नागरिक, नातेवाईक तसेच अन्य कुटुंबीय हादरून गेले आहेत. एक सधन, सुशिक्षित कुटुंबाची कोरोनामुळे वाताहात झाली. घरातील प्रमुख पुरुष गेल्याने म्हेतर कुटुंब उघड्यावर पडले आहे.

-उपचारात हयगय झाल्याचा आरोप-

शिवाजीराव व श्रीकांत यांना ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेथील डॉक्टरांकडून उपचारातील हयगयीमुळे आमच्यावर ही आफत ओढवल्याचा आरोप म्हेतर कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयाचे बिल सांगतील तसे दिले, रेमडेसिविर इंजेक्शनन आणून द्या म्हणून सांगताच १० इंजेक्शन तत्काळ आणून दिली त्यातील एकच वापरले बाकीच्या इंजेक्शनचा त्यांनी वापरच केला नाही. शिवाजीराव यांच्याबाबतीत होत असलेली हेळसांड श्रीकांतने पाहिली होती. त्यांचा मृत्यू होताच मला या रुग्णालयातून हलवा, अशी विनंती केली. त्यामुळे श्रीकांतला गंभीर परिस्थितीत सीपीआर रुग्णालयात दाखल करावे लागले, असे कुटुंबीयांनी सांगितले.

-जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार-

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची कर्ती माणसं गेली आहेत, अन्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर असे कटू प्रसंग येऊ नयेत अशी आमची भावना आहे. संबंधित डॉक्टर, रुग्णालय यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही म्हेतर कुटुंबीयांनी सांगितले.