शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

तीन कर्ते पुरुष गेले, घर उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कुटुंब प्रमुख पती-पत्नी दोघंही शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, दोन्ही मुलांना चांगली नोकरी, मुलगी, सुना, नातवंडे यांनी घर ...

कोल्हापूर : कुटुंब प्रमुख पती-पत्नी दोघंही शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, दोन्ही मुलांना चांगली नोकरी, मुलगी, सुना, नातवंडे यांनी घर कसं आनंदानं भरलेलं, सुखा-समाधानानं फुललेलं. सगळं कसं मनासारखं चाललं होतं. पण, या आनंदी गोकुळाला कोरोनाचं ग्रहण लागलं आणि एका महिन्याच्या आतच अचानक एखाद्या वादळानं घर उद्ध्वस्त व्हावं तसं झालं. घरातील तीन कर्ते पुरुष गेले. घर उघड्यावर पडले. सानेगुरुजी हौसिंग सोसायटीमधील म्हेतर कुटुंबावर कोरोनाने हा घाला घातला आहे.

शिवाजीराव एकनाथ म्हेतर (वय ७८) महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी विजया (वय ६५) या सुद्धा प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत हा दि.२ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्यामुळे त्याला सानेगुरुजी येथील मैत्रांगण कोविड सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले. पुढे दि. ८ मे रोजी शिवाजीराव यांना कोरोनाने गाठलं. पाठोपाठ त्यांच्या पत्नी विजया यांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. दोघांनाही कसलीच लक्षणं नव्हती, तरीही खबरदारी म्हणून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुटुंबावरील संकट आणि कोरोनाचे भय इथंच संपलं नाही तर दिवसागणिक वेगाने वाढत गेले. शिवाजीराव यांचा मुलगा श्रीकांत व मुलगी वैशाली यांनाही कोराेनाची लागण झाली. श्रीकांत यास राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात, तर वैशाली घरीच राहून उपचार घेतले. एका घरातील पाच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असल्यामुळे अन्य कुटुंबीय, नातेवाईकांची प्रचंड धावपळ उडाली. कोरोनामुळे शिवाजीराव, प्रशांत, श्रीकांत यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि म्हेतर कुटुंबावर एक एक आघात होत गेले. शिवाजीराव यांचे दि. १२ मे रोजी, तर प्रशांत यांचे दि. १६ मे रोजी निधन झाले. त्यानंतर, गुरुवारी (दि.२७ मे) श्रीकांतचे निधन झाले.

एकाच घरातील तीन कर्त्या पुरुषांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होणे या म्हेतर कुटुंबीयांवर ओढवलेल्या वेदनादायी प्रसंगाने परिसरातील नागरिक, नातेवाईक तसेच अन्य कुटुंबीय हादरून गेले आहेत. एक सधन, सुशिक्षित कुटुंबाची कोरोनामुळे वाताहात झाली. घरातील प्रमुख पुरुष गेल्याने म्हेतर कुटुंब उघड्यावर पडले आहे.

-उपचारात हयगय झाल्याचा आरोप-

शिवाजीराव व श्रीकांत यांना ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेथील डॉक्टरांकडून उपचारातील हयगयीमुळे आमच्यावर ही आफत ओढवल्याचा आरोप म्हेतर कुटुंबीयांनी केला आहे. रुग्णालयाचे बिल सांगतील तसे दिले, रेमडेसिविर इंजेक्शनन आणून द्या म्हणून सांगताच १० इंजेक्शन तत्काळ आणून दिली त्यातील एकच वापरले बाकीच्या इंजेक्शनचा त्यांनी वापरच केला नाही. शिवाजीराव यांच्याबाबतीत होत असलेली हेळसांड श्रीकांतने पाहिली होती. त्यांचा मृत्यू होताच मला या रुग्णालयातून हलवा, अशी विनंती केली. त्यामुळे श्रीकांतला गंभीर परिस्थितीत सीपीआर रुग्णालयात दाखल करावे लागले, असे कुटुंबीयांनी सांगितले.

-जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार-

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमची कर्ती माणसं गेली आहेत, अन्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर असे कटू प्रसंग येऊ नयेत अशी आमची भावना आहे. संबंधित डॉक्टर, रुग्णालय यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही म्हेतर कुटुंबीयांनी सांगितले.