शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परप्रांतीयांना काम देणाऱ्यांनी मापे काढू नयेत --चंद्रदीप नरके--रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:54 IST

‘गोकुळ’मध्ये आठ-दहा वर्षे काम करणा-या कामगारांना काढून त्या ठिकाणी गावातील नेत्यांची पोरं लावली. ज्यांच्या दारात आता तुम्ही मतासाठी जाता, त्या सामान्य माणसाची आठवण पी. एन. पाटील यांना का झाली नाही?

ठळक मुद्दे चंद्रदीप नरकेंचा पलटवार : सहानुभूतीवर नव्हे तर विकास, संपर्क पाहूनच लोक निवडून देतात

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : मतदारसंघातील रस्ते, मंदिरे, पूल, सांस्कृतिक सभागृह बांधणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. ही कामे आपण प्राधान्याने केलीच; पण सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाईही केली. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ७३४ कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला. नऊ पूल उभारून दळणवळणाला चालना दिली. टोल, हद्दवाढ, प्राधिकरण, मराठा आरक्षण या आंदोलनात केवळ बघ्याची भूमिका न घेता मैदानात उतरून यश मिळविल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

आम्ही ‘कुंभी’ कारखान्यातील सहवीज प्रकल्प, कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, कुंभी बॅँक, यशवंत संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार दिला. आजोबा स्वर्गीय डी. सी. नरके यांनी काढलेल्या संस्था आम्ही सक्षमपणे चालवत आहोत. आम्ही किती हातांना काम दिले, याची मापे पी. एन. पाटील यांनी काढण्यापेक्षा स्वत:च्या संस्थांकडे लक्ष द्यावे. मतदारसंघातील तरुणांबद्दल एवढी आस्था होती तर ‘भोगावती’तील ५८० कामगारांच्या पोटावर लाथ का मारली? तिथे कामगारांची गरज नव्हती तर लगेच आपल्या बगलबच्च्यांचे १५० कामगार कसे भरले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. ‘गोकुळ’मध्ये आठ-दहा वर्षे काम करणाºया कामगारांना काढून त्या ठिकाणी गावातील नेत्यांची पोरं लावली. ज्यांच्या दारात आता तुम्ही मतासाठी जाता, त्या सामान्य माणसाची आठवण पी. एन. पाटील यांना का झाली नाही? तुमच्या संचालकांनी कशा पद्धतीने नोकरभरती केली, हे जिल्ह्याला माहीत असून तुमचा स्वच्छतेचा बुरखा फाटला आहे.

आम्ही ‘कुंभी’मध्ये गट-तट न पाहता १० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना कायम करतो. आजपर्यंत हजारो तरुणांना नोकºया दिल्या; पण त्यांच्या अर्ध्या कप चहात मिंधा नाही. फोंड्या माळावर उभ्या केलेल्या राजीवजी सूतगिरणीच्या कारभाराचे तुणतुणे ‘पी. एन.’ वाजवतात, त्याची आज अवस्था काय आहे? स्थानिक कामगारांना किती पगार देता? कामगारांना का कमी केले? निवृत्ती संघ रसातळाला कोणी घालविला? याची उत्तरे पी. एन. पाटील यांनी करवीरच्या जनतेला द्यावीत. नुसत्या सहानूभूतीने निवडणुका जिंकता येत नाहीत. तुम्हाला कशाबद्दल मतदारांनी सहानुभूती दाखवायची? संपर्क नसल्याने मतदारांत नाराजी आहे. ती घालवण्यासाठी ते स्वत:च सहानुभूतीचा आव आणत आहेत. पाच वर्षे पायांना भिंगरी लावून मतदारसंघात विकासकामे केली, संपर्क ठेवला, लोकांच्या सुखदु:खात सहभागी झाल्याने जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. महापुराच्या काळात घरदार सोडून आठ-दहा दिवस मानवतेच्या भावनेने लोकांना मदत केली; पण दुर्दैवाने महापुरात मी केलेल्या मदतीची पी. एन. पाटील टिंगल करीत आहेत. सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाची टिंगल करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे नरके यांनी सांगितले.

दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी स्थापन केलेल्या ‘भोगावती’वर तुम्ही चेअरमन म्हणून बसला. ज्या ‘गोकुळ’च्या जिवावर राजकीय उड्या मारता, त्याची स्थापना कोणी केली? आनंदराव पाटील-चुयेकर यांनी लावलेले रोपटे अरुण नरके यांनी वाढविले आणि तेथील मलई खाणारे आम्हाला प्रश्न विचारत असल्याचा टोला नरके यांनी लगावला.ज्या राजीवजी सूतगिरणीची टिमकी पी. एन. पाटील वाजवतात तेथील स्थानिक कामगारांना त्यांनी का कमी केले? बिहारी कामगारांच्या बळावर ती का चालवावी लागली? याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्वर्गीय दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी काढलेल्या ‘भोगावती’ कारखाना व आनंदराव पाटील-चुयेकर यांनी काढलेल्या ‘गोकुळ’वर उपरे नेतृत्व करणाºयांनी आमची मापे काढू नयेत, असा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना हाणला.

मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत ७३४ कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला. टोल, हद्दवाढ, प्राधिकरण, मराठा आरक्षण या आंदोलनात बघ्याची भूमिका न घेता मैदानात उतरलो. महापुरासारख्या आपत्तीवेळी मानवतेच्या भावनेने पूरग्रस्तांना मदत केली.- चंद्रदीप नरके

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण