शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : महाडिकांचे सगळे अर्थकारण ‘गोकुळ’वर चालतेय. ‘गोकुळ’ला ज्यांनी खाल्ले त्यांचा पायउतार करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. गोकुळ एकाच्या ताब्यात असून, तो सर्वसामान्य सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पेठवडगाव येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभा झाली. यावेळी आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदचे अर्थ सभापती प्रवीण यादव, विजयसिंह माने, आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, महाडिकांचे अर्थकारण ‘गोकुळ’वर अवलंबून आहे. यामुळे कधीही रस्त्यावर न दिसणारे महाडिक गावोगावी फिरत आहेत. स्वत:च्या नावावर टँकर, जावयांच्या नावावर एजन्सी, वासांचे दूध व पशुखाद्यावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

आमदार राजू आवळे म्हणाले, जिल्ह्याची संस्था जिल्ह्यात राहिली आहे. मल्टिस्टेट झाले असते तर पश्चात्ताप करण्याची वेळ आली असती. यामध्ये कर्नाटक, इस्लामपूरचे मतदार वाढले असते. त्यामुळे सभासदांना किंमत मिळाली नसती. एकदा बदल घडविण्याची गरज आहे. सहकाराला प्रतिष्ठा देण्यासाठी एकवेळ संधी द्यावी तसेच मिणचेकर यांच्या रूपाने अठरा वर्षांनी तालुक्याला संधी मिळाली आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील. तसेच महाआघाडी म्हणून यापुढे एकत्र राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुरलीधर जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, नावेद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसनबापू चौगुले, बायजी शेळके, अभिजीत तायशेट्ये, सुश्मिता पाटील, रंजना रेडेकर, अभिजीत माने, शिरोली सरपंच शशिकांत खवरे, सचिन चव्हाण, चेतन चव्हाण उपस्थित होते.

चौकट : तर कर्नाटकच्या सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते

दूध उत्पादकांसाठीच्या लढाईत मल्टीस्टेटला विरोध करून या परिवर्तन लढाईची सुरुवात सभासदांना घेऊन केली आहे. सभासदांनी साथ दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे अन्यथा कर्नाटकातील सभासदांच्या जोरावर मलिदा खाणारेच मालक झाले असते. ही लढाई सत्तेसाठी नसून, दूध उत्पादकांना जादा दर देण्यासाठीची आहे. यामुळे आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांचे सुपुत्र अभिजीत माने हे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे प्रचार सभेत उपस्थित होते.