शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

‘विशेष घटक’मधील खर्चाची ‘त्रयस्थ’ चौकशी

By admin | Updated: January 3, 2017 01:15 IST

चंद्रकांतदादा : डिसेंबरअखेर ४३ टक्केच निधी खर्च; समाजकल्याण विभागाची आढावा बैठक

कोल्हापूर : अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत (विशेष घटक योजना) उपलब्ध निधीतून झालेल्या खर्चाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करू, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. अनुसूचित जाती उपयोजना सन २०१६-१७ साठी १०० कोटी ८१ लाख रुपये मंजूर निधी असून, डिसेंबरअखेर ४० कोटी ९९ लाख रुपये खर्च झाला आहे. उपलब्ध निधीच्या केवळ ४३ टक्के खर्च झाला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी मार्चअखेर १०० टक्के निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. विचारेमाळ येथील समाजकल्याण कार्यालय येथे अनुसूचित जाती उपयोजनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत यावर्षी खर्च होणाऱ्या निधीतून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला, कोणती कामे पूर्ण झाली याची माहिती संबंधित यंत्रणांनी द्यावी. या सर्वांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत खातरजमा करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.यावर्षी समाजकल्याण विभागाने १५ कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ कोटी २६ लाख रुपये आणि क्रीडा विभागाने ३ कोटी ४० लाख रुपये असा १०० टक्के निधी खर्च केला आहे तर सन २०१७-१८ साठी १६९ कोटी १२ लाख एवढी असून ११३ कोटी ४१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. यामधील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ३ कोटी ४० लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यंत्रणानिहाय खर्चाचा आढावा घेत यापुढे प्रत्येक विभागाने या योजनेशी संबंधित खर्चाचा अहवाल प्रत्येक महिन्याला सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे पाठवावा. यामध्ये हलगर्जी करणाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे निर्र्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.विशेष घटक योजनेमधील निधी वितरण आणि प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी सैनी यांनी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायर्कारी अभियंता एन. एम. वेदपाठक, आर. एस. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, संतोष चिकणे आदी उपस्थित होते.अजूनही साकवांची आवश्यकता आहे का?जिल्ह्यात अद्यापही दलित वस्त्यांमध्ये साकव बांधकामे होत आहेत. इतकी वर्षे साकव बांधकामे सुरू असूनही अद्यापही या कामांची आवश्यकता का आहे, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.विविध विभागांचा आढावाबैठकीत कृषी विभाग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, मृद्संधारण, माहिती व प्रसिद्धी, एकात्मिक ग्रामीण विकास, नगरपालिका प्रशासन, एमएसइबी, उद्योग, क्रीडा, तंत्रशिक्षण, स्वच्छता व पाणीपुरवठा, नगरविकास, महिला व बालविकास, माध्यमिक शिक्षण, आदींकडील खर्चाचा आढावा घेण्यात आला.