शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

‘विशेष घटक’मधील खर्चाची ‘त्रयस्थ’ चौकशी

By admin | Updated: January 3, 2017 01:15 IST

चंद्रकांतदादा : डिसेंबरअखेर ४३ टक्केच निधी खर्च; समाजकल्याण विभागाची आढावा बैठक

कोल्हापूर : अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत (विशेष घटक योजना) उपलब्ध निधीतून झालेल्या खर्चाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करू, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. अनुसूचित जाती उपयोजना सन २०१६-१७ साठी १०० कोटी ८१ लाख रुपये मंजूर निधी असून, डिसेंबरअखेर ४० कोटी ९९ लाख रुपये खर्च झाला आहे. उपलब्ध निधीच्या केवळ ४३ टक्के खर्च झाला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी मार्चअखेर १०० टक्के निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. विचारेमाळ येथील समाजकल्याण कार्यालय येथे अनुसूचित जाती उपयोजनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत यावर्षी खर्च होणाऱ्या निधीतून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला, कोणती कामे पूर्ण झाली याची माहिती संबंधित यंत्रणांनी द्यावी. या सर्वांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत खातरजमा करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले.यावर्षी समाजकल्याण विभागाने १५ कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ कोटी २६ लाख रुपये आणि क्रीडा विभागाने ३ कोटी ४० लाख रुपये असा १०० टक्के निधी खर्च केला आहे तर सन २०१७-१८ साठी १६९ कोटी १२ लाख एवढी असून ११३ कोटी ४१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. यामधील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ३ कोटी ४० लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यंत्रणानिहाय खर्चाचा आढावा घेत यापुढे प्रत्येक विभागाने या योजनेशी संबंधित खर्चाचा अहवाल प्रत्येक महिन्याला सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे पाठवावा. यामध्ये हलगर्जी करणाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे निर्र्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.विशेष घटक योजनेमधील निधी वितरण आणि प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी सैनी यांनी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायर्कारी अभियंता एन. एम. वेदपाठक, आर. एस. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, संतोष चिकणे आदी उपस्थित होते.अजूनही साकवांची आवश्यकता आहे का?जिल्ह्यात अद्यापही दलित वस्त्यांमध्ये साकव बांधकामे होत आहेत. इतकी वर्षे साकव बांधकामे सुरू असूनही अद्यापही या कामांची आवश्यकता का आहे, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.विविध विभागांचा आढावाबैठकीत कृषी विभाग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, मृद्संधारण, माहिती व प्रसिद्धी, एकात्मिक ग्रामीण विकास, नगरपालिका प्रशासन, एमएसइबी, उद्योग, क्रीडा, तंत्रशिक्षण, स्वच्छता व पाणीपुरवठा, नगरविकास, महिला व बालविकास, माध्यमिक शिक्षण, आदींकडील खर्चाचा आढावा घेण्यात आला.