शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

दुसऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत असे जगा -: नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:46 IST

जीवन जगण्यासाठी गरजा फार कमी लागतात; पण सद्य:स्थितीत माणसाने त्या वाढवून ठेवल्या आहेत. आशाआकांक्षा मर्यादित ठेवल्या तर जीवन अगदी सहजपणे जगता येते.

ठळक मुद्देपेठवडगाव येथे विजयवंत महोत्सव समारोप

पेठवडगाव : जीवन जगण्यासाठी गरजा फार कमी लागतात; पण सद्य:स्थितीत माणसाने त्या वाढवून ठेवल्या आहेत. आशाआकांक्षा मर्यादित ठेवल्या तर जीवन अगदी सहजपणे जगता येते. दुसºया व्यक्तीला तोशीस होणार नाही. त्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, अशी जीवनात वाटचाल ठेवा, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी केले.

येथील शाहू शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विजयवंत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके होते. यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, विद्या पोळ, आर. डी. पाटील, सुनील हुक्केरी, राजन शेटे, आनंदराव म्हेत्रस, जवाहर सलगर, संगीता मिरजकर, अनिता चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने विजयादेवी यादव मानपत्र देण्यात आले.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, नुसत्या शिक्षणावर आयुष्य संपत नाही. त्याला संस्काराची जोड लागते. समाजात आजूबाजूला होणारी घुसमट समजली पाहिजे. ती घुसमट मांडून त्यावर उपाय शोधता आला पाहिजे. बाहेरच्या जगात फिरताना घाबरता कामा नये. समोर अघटित काही घडत असेल तर धावून जाऊन प्रतिकार करण्याची हिंमत बाळगली पाहिजे.

डॉ. सुहास वारके म्हणाले, समाजाचे रक्षण करता करता वर्दीला रंग प्राप्त झाला याचा सार्थ अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जिल्ह्यातील जनतेला आहे. त्यामुळे आजच्या संगणक युगातील या जिल्ह्याची नवी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर करणारी युवा पिढी या संस्थेत घडली आहे.

विद्या पोळ म्हणाल्या, तत्कालीन काळात प्रस्थापित शाळेने नाकारलेल्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी स्व. विजयसिंह यादव यांनी या संस्थेची स्थापना केली होती. मूल्य आधारित संस्कारक्षम शिक्षण देणे हा संस्थेचा हेतू आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी स्व. यादव यांनी कधीही सौदेबाजी केली नाही. आर्थिक पुरवठा करणाºया शिक्षण संस्था उभा न करता माणूस घडविणारी ही संस्था निर्माण केल्याचे समाधान मिळतआहे.

राजन अतिग्रे, वर्षा सहदेव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या विजया चव्हाण यांनी आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNana Patekarनाना पाटेकर