शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दुसऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत असे जगा -: नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:46 IST

जीवन जगण्यासाठी गरजा फार कमी लागतात; पण सद्य:स्थितीत माणसाने त्या वाढवून ठेवल्या आहेत. आशाआकांक्षा मर्यादित ठेवल्या तर जीवन अगदी सहजपणे जगता येते.

ठळक मुद्देपेठवडगाव येथे विजयवंत महोत्सव समारोप

पेठवडगाव : जीवन जगण्यासाठी गरजा फार कमी लागतात; पण सद्य:स्थितीत माणसाने त्या वाढवून ठेवल्या आहेत. आशाआकांक्षा मर्यादित ठेवल्या तर जीवन अगदी सहजपणे जगता येते. दुसºया व्यक्तीला तोशीस होणार नाही. त्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, अशी जीवनात वाटचाल ठेवा, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी केले.

येथील शाहू शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विजयवंत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके होते. यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, विद्या पोळ, आर. डी. पाटील, सुनील हुक्केरी, राजन शेटे, आनंदराव म्हेत्रस, जवाहर सलगर, संगीता मिरजकर, अनिता चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने विजयादेवी यादव मानपत्र देण्यात आले.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, नुसत्या शिक्षणावर आयुष्य संपत नाही. त्याला संस्काराची जोड लागते. समाजात आजूबाजूला होणारी घुसमट समजली पाहिजे. ती घुसमट मांडून त्यावर उपाय शोधता आला पाहिजे. बाहेरच्या जगात फिरताना घाबरता कामा नये. समोर अघटित काही घडत असेल तर धावून जाऊन प्रतिकार करण्याची हिंमत बाळगली पाहिजे.

डॉ. सुहास वारके म्हणाले, समाजाचे रक्षण करता करता वर्दीला रंग प्राप्त झाला याचा सार्थ अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जिल्ह्यातील जनतेला आहे. त्यामुळे आजच्या संगणक युगातील या जिल्ह्याची नवी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर करणारी युवा पिढी या संस्थेत घडली आहे.

विद्या पोळ म्हणाल्या, तत्कालीन काळात प्रस्थापित शाळेने नाकारलेल्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी स्व. विजयसिंह यादव यांनी या संस्थेची स्थापना केली होती. मूल्य आधारित संस्कारक्षम शिक्षण देणे हा संस्थेचा हेतू आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी स्व. यादव यांनी कधीही सौदेबाजी केली नाही. आर्थिक पुरवठा करणाºया शिक्षण संस्था उभा न करता माणूस घडविणारी ही संस्था निर्माण केल्याचे समाधान मिळतआहे.

राजन अतिग्रे, वर्षा सहदेव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या विजया चव्हाण यांनी आभार मानले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNana Patekarनाना पाटेकर