शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 11:16 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक ...

संतोष मिठारीकोल्हापूर : जिल्ह्याच्या अर्थचक्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील रस्ते चकाचक होणार आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोल्हापुरातील प्रादेशिक कार्यालयाने ठेवले आहे. रस्ते, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा वाढल्याने औद्योगिक क्षेत्राची गती वाढणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उद्योग क्षेत्रातील कामांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एमआयडीसी कार्यालयाने पाऊलं टाकली आहेत. त्यात काही मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा टाकीची क्षमता वाढविणे आदींचा समावेश आहे. सर्व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविणे आदी कामांबाबतचे प्रस्ताव कोल्हापूर कार्यालयाने औद्योगिक विकास महामंडळाला पाठविले आहेत.

औद्योगिक वसाहतनिहाय कामांची स्थिती

शिरोलीयेथील १८ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. पाणीपुरवठा करणारी १९ किलोमीटरची जुनी पाइप बदलली आहे. बाराशे दशलक्ष लीटर क्षमतेची पाण्याची नवी टाकी (जलकुंभ) बांंधण्यात येणार आहे.गोकुळ शिरगावयेथील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. बाराशे दशलक्ष लीटर क्षमतेची पाण्याची नवी टाकी उभारली आहे. कणेरी फाटा येथील उड्डाणपुलापासूनचा दीड किलोमीटरच्या मुख्य आणि अन्य अंतर्गत १७ किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.

कागल-हातकणंगलेयेथील लक्ष्मी टेकडी चौक ते हुपरीतील जवाहर साखर कारखान्यापर्यंतच्या दहा किलोमीटरपर्यंतच्या मुख्य रस्त्यापैकी आठ किलोमीटरचे डांबरीकरण केले आहे. उर्वरित दोन किलोमीटरचे डांबरीकरण केले जाणार आहे. अडीच किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण आणि उर्वरित तीन किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. मुख्य चौकातील अतिक्रमणे काढली आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे.गडहिंग्लज-हलकर्णीया दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये सध्या विविध ३५ प्रकारचे उद्योग कार्यन्वित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या वसाहतींमध्ये उद्योग सुरू करण्यास इच्छुक वाढत आहेत. या महिन्यात चार जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव महामंडळाकडे आले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधा सुधारणा करण्यात येत आहे. काही वस्तींमधील मुख्य, अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते, जलकुंभाची क्षमता वाढविणे आदी कामांबाबतचा प्रस्ताव महामंडळाला सादर केला आहे.  - राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसीroad safetyरस्ते सुरक्षा