शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

Kolhapur: राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील, दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ लागेल; बाळूमामा भंडारा उत्सवात भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:39 IST

कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पाणी येतय

बाजीराव जठार    वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी आज, शनिवारी पहाटे संत बाळूमामा मंदिरा समोर भाकणूक (भविष्यवाणी ) संपन्न झाली. कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी ही भाकणूक केली. या मराठी वर्षातील ही शेवटची अन् महत्वाची भाकणूक असल्याने काय भविष्य कथन होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. भाकणूकप्रसंगी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश मधील हजारो भाविकांची उपस्थिती होती.संत बाळूमामा मंदिरा समोर केलेल्या भाकणूकीचा(भविष्यवाणी ) गोषवारा असा :भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया, चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील, अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.कोरिया, चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत-पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. शहरे उध्वस्त होतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील. भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल. दुनिया पेटेल. काळरात्र येईल सावध रहा.राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतीलदेश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील. नेतेमंडळी तुरुंगात जातीलभ्रष्टाचार उदंड होईल. नेतेमंडळी तुंरुगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. २०२४ मध्ये राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडाचे राज्य येईल. जातीयवाचक राजकारणाला ऊत येईल. जातीयवादी राजकारण सुरू होईल. जगात डोंगरा एवढं पाप वाढले आहे. दोऱ्याएवढेच पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पाणी येतयकोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतय. चंद्र सुर्याची टक्कर लागेल. तीन दिवसरात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फूले पडतील. सत्यानं वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाह्या होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरूण पिढी वाममार्गाला लागेल. रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील. नितीमत्ता बाळगा. पाच बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्ह्या.दागिने पैसे फुकाचे…तीन महिन्याचे धान्य पिकेल. खरीप बहुत होईल. तांबडे रास मध्यंतरी पांढर धान्य उदंड पिकेल. गवताची पेंडी मध्यम राहील. धान्य दारात वैरण घरात ठेवाल. धान्य महागेल. जगणं मुश्कील होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढत जाईल. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. माणूस कागदाचा घोडा नाचवेल. दागिने पैसे फुकाचे होतील. वैरणीचा भाव वाढत जाईल. वैरण धान्याच्या चोरी होतील, सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पीकेल. पांढर धान्य मोलाने विकेल. बैलांची किंमत बकऱ्याला, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल.

नदीला कुलुपे पडतील…मनुष्य जंगलात जाईल, जंगलातील पशूधन गावात येईल. वाड्यावस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल. भुभाग जलमय होईल. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. ऊन्ह्याळाचा पावसाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचा होईल. पाण्याचा कप विकत मिळेल.मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल. डॉक्टर हात टेकतील. ऊसाचा काऊस होईल. साखरेचा दर कमीजास्त राहील. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदी राहील. साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील. ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजेल. शेतकरी चिंतेत राहील. मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर ग्रहावर राहायला जाईल. बाळुमामा शेषनागाचा अवतार हाय. या गावात मी निशाण रोवलंय, माझ ठाण मांडलय. बाळूमामांचा त्रिभुवनात जयजयकार होणार.

आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईलआदमापुर बाळुमामांची पवित्र भुमी हाय. या गावाचा महिमा जगात वाढेल. आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला, करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे. तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंPoliticsराजकारण