शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:59 AM

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी बेडी बनून घट्ट बसली आहे.गेल्याच आठवड्यात करवीर तालुक्यातील एका तरुणाने ठरलेले लग्न मोडले म्हणून आत्महत्या केली. ‘तुमचे आडनाव चौगले आहे म्हणून स्थळ आम्हाला पसंत नाही,’ असा निरोप त्यांना आल्याचे सांगण्यात येते. लग्न ठरल्याच्या आनंदात असताना असा निरोप आल्याने त्याचा ताण न सहन झाल्याने त्याने जीवनयात्राच संपवली. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील एका गावातील कष्टकरी तरुणाचेही लग्न ठरत आले होते. त्याचे आडनाव ‘साळोखे ऊर्फ चौगले’. कागल तालुक्यातील मुलीच्या नातेवाइकांनी ‘साळोखे ऊर्फ चौगले’ असे आडनाव समजल्यावर अन्य सगळ्या गोष्टी पसंत असतानाही स्थळास नकार दिला. त्या मुलासही त्याचा मानसिक धक्का बसला.ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून मुळात वधू-वर सूचक केंद्रात माहिती घ्यायला गेल्यावर ‘चौगले’ आडनाव असेल तर लोक बायोडाटाच हातात घ्यायला तयार नाहीत. त्यातही ‘चौगले’ आडनावाची सून करून आणतात; परंतु त्यांच्यात मुलगी द्यायला सहसा तयार नाहीत. पूर्वी गावगाड्यामध्ये पाटील, देशपांडे, इनामदार, मुसलमान व चौघला यांनाही मानकरी मानले गेले. काही ठिकाणी गावाची वेश राखण करणारा तो ‘चौघला’ असाही उल्लेख आढळतो. हे लोक मराठा समाजातीलच आहेत. त्यांचे गावात अळीला घर आहे. इतरांप्रमाणेच त्यांची शेतजमीन आहे म्हणजे तो देखील मराठा कुणबीच आहे.कधी तरी कुठल्या शतकात त्यांच्याबद्दल एखादा अपसमज पसरला गेला व तोच धरूनआजही आपण अशा जातीतील उच्च-नीचतेच्या भिंतीला कवटाळूनबसणार असू तर ‘एक मराठा...लाख मराठा...’ म्हणणे व्यर्थआहे.हे जरूर बघा..‘चौगले’ आडनाव असलेल्या मुलांमध्ये काही अनुवंशिक आजार असतील तर त्याबाबत जरूर हरकत घेतली जावी. त्याचे करिअर पाहावे. त्याचा रक्तगटही पाहावा. त्याची आर्थिक स्थिती, घरदार, सामाजिक वर्तन याबद्दल आग्रह धरावा व त्यानुसार अपेक्षापूर्ती होत नसेल तर जरूर स्थळ नाकारावे; परंतु निव्वळ ‘चौगले’ आडनाव आहे म्हणून स्थळ नाकारणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे.सुशिक्षितच जास्त अडाणी..पूर्वीचे लोक ‘जाडे-भरडे बघा आणि सांभाळून घ्या,’ असे म्हणायचे परंतु आता शिकलेले लोकच जास्त अडाणी झाले असून ते कुळी, पदर, उच्च-नीचता याचा बाऊ करू लागले आहेत. त्यामुळे हा समाज पुढे निघाला आहे की मागे याचा विचार करण्याची गरज आहे.उलटे चित्र..लिंगायत-जैन समाजातही ‘चौगुले’ आडनावाचे लोक आहेत. लिंगायत समाजात हे आडनाव जास्त लोकांचे आहे; परंतु त्या समाजात ‘चौगुले’ आडनावाबाबत अशी भावना नाही. उलट त्या समाजात चौगुले यांना ‘पंचम’ म्हणजे उच्च कुळातील मानले जाते. आडनाव एकच परंतु दोन समाजात त्याबद्दल वेगवेगळी भावना आहे.