शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:59 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी बेडी बनून घट्ट बसली आहे.गेल्याच आठवड्यात करवीर तालुक्यातील एका तरुणाने ठरलेले लग्न मोडले म्हणून आत्महत्या केली. ‘तुमचे आडनाव चौगले आहे म्हणून स्थळ आम्हाला पसंत नाही,’ असा निरोप त्यांना आल्याचे सांगण्यात येते. लग्न ठरल्याच्या आनंदात असताना असा निरोप आल्याने त्याचा ताण न सहन झाल्याने त्याने जीवनयात्राच संपवली. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील एका गावातील कष्टकरी तरुणाचेही लग्न ठरत आले होते. त्याचे आडनाव ‘साळोखे ऊर्फ चौगले’. कागल तालुक्यातील मुलीच्या नातेवाइकांनी ‘साळोखे ऊर्फ चौगले’ असे आडनाव समजल्यावर अन्य सगळ्या गोष्टी पसंत असतानाही स्थळास नकार दिला. त्या मुलासही त्याचा मानसिक धक्का बसला.ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून मुळात वधू-वर सूचक केंद्रात माहिती घ्यायला गेल्यावर ‘चौगले’ आडनाव असेल तर लोक बायोडाटाच हातात घ्यायला तयार नाहीत. त्यातही ‘चौगले’ आडनावाची सून करून आणतात; परंतु त्यांच्यात मुलगी द्यायला सहसा तयार नाहीत. पूर्वी गावगाड्यामध्ये पाटील, देशपांडे, इनामदार, मुसलमान व चौघला यांनाही मानकरी मानले गेले. काही ठिकाणी गावाची वेश राखण करणारा तो ‘चौघला’ असाही उल्लेख आढळतो. हे लोक मराठा समाजातीलच आहेत. त्यांचे गावात अळीला घर आहे. इतरांप्रमाणेच त्यांची शेतजमीन आहे म्हणजे तो देखील मराठा कुणबीच आहे.कधी तरी कुठल्या शतकात त्यांच्याबद्दल एखादा अपसमज पसरला गेला व तोच धरूनआजही आपण अशा जातीतील उच्च-नीचतेच्या भिंतीला कवटाळूनबसणार असू तर ‘एक मराठा...लाख मराठा...’ म्हणणे व्यर्थआहे.हे जरूर बघा..‘चौगले’ आडनाव असलेल्या मुलांमध्ये काही अनुवंशिक आजार असतील तर त्याबाबत जरूर हरकत घेतली जावी. त्याचे करिअर पाहावे. त्याचा रक्तगटही पाहावा. त्याची आर्थिक स्थिती, घरदार, सामाजिक वर्तन याबद्दल आग्रह धरावा व त्यानुसार अपेक्षापूर्ती होत नसेल तर जरूर स्थळ नाकारावे; परंतु निव्वळ ‘चौगले’ आडनाव आहे म्हणून स्थळ नाकारणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे.सुशिक्षितच जास्त अडाणी..पूर्वीचे लोक ‘जाडे-भरडे बघा आणि सांभाळून घ्या,’ असे म्हणायचे परंतु आता शिकलेले लोकच जास्त अडाणी झाले असून ते कुळी, पदर, उच्च-नीचता याचा बाऊ करू लागले आहेत. त्यामुळे हा समाज पुढे निघाला आहे की मागे याचा विचार करण्याची गरज आहे.उलटे चित्र..लिंगायत-जैन समाजातही ‘चौगुले’ आडनावाचे लोक आहेत. लिंगायत समाजात हे आडनाव जास्त लोकांचे आहे; परंतु त्या समाजात ‘चौगुले’ आडनावाबाबत अशी भावना नाही. उलट त्या समाजात चौगुले यांना ‘पंचम’ म्हणजे उच्च कुळातील मानले जाते. आडनाव एकच परंतु दोन समाजात त्याबद्दल वेगवेगळी भावना आहे.