शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

‘चौगले’ आडनावाबाबत अजूनही हीनता, चुकीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:59 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळून येत नाही, अशा समाजाबद्दल आजही अशी भावना बाळगणे हे खरेतर एकूण मराठा समाजाच्या पायातील लोखंडी बेडी बनून घट्ट बसली आहे.गेल्याच आठवड्यात करवीर तालुक्यातील एका तरुणाने ठरलेले लग्न मोडले म्हणून आत्महत्या केली. ‘तुमचे आडनाव चौगले आहे म्हणून स्थळ आम्हाला पसंत नाही,’ असा निरोप त्यांना आल्याचे सांगण्यात येते. लग्न ठरल्याच्या आनंदात असताना असा निरोप आल्याने त्याचा ताण न सहन झाल्याने त्याने जीवनयात्राच संपवली. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यातील एका गावातील कष्टकरी तरुणाचेही लग्न ठरत आले होते. त्याचे आडनाव ‘साळोखे ऊर्फ चौगले’. कागल तालुक्यातील मुलीच्या नातेवाइकांनी ‘साळोखे ऊर्फ चौगले’ असे आडनाव समजल्यावर अन्य सगळ्या गोष्टी पसंत असतानाही स्थळास नकार दिला. त्या मुलासही त्याचा मानसिक धक्का बसला.ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून मुळात वधू-वर सूचक केंद्रात माहिती घ्यायला गेल्यावर ‘चौगले’ आडनाव असेल तर लोक बायोडाटाच हातात घ्यायला तयार नाहीत. त्यातही ‘चौगले’ आडनावाची सून करून आणतात; परंतु त्यांच्यात मुलगी द्यायला सहसा तयार नाहीत. पूर्वी गावगाड्यामध्ये पाटील, देशपांडे, इनामदार, मुसलमान व चौघला यांनाही मानकरी मानले गेले. काही ठिकाणी गावाची वेश राखण करणारा तो ‘चौघला’ असाही उल्लेख आढळतो. हे लोक मराठा समाजातीलच आहेत. त्यांचे गावात अळीला घर आहे. इतरांप्रमाणेच त्यांची शेतजमीन आहे म्हणजे तो देखील मराठा कुणबीच आहे.कधी तरी कुठल्या शतकात त्यांच्याबद्दल एखादा अपसमज पसरला गेला व तोच धरूनआजही आपण अशा जातीतील उच्च-नीचतेच्या भिंतीला कवटाळूनबसणार असू तर ‘एक मराठा...लाख मराठा...’ म्हणणे व्यर्थआहे.हे जरूर बघा..‘चौगले’ आडनाव असलेल्या मुलांमध्ये काही अनुवंशिक आजार असतील तर त्याबाबत जरूर हरकत घेतली जावी. त्याचे करिअर पाहावे. त्याचा रक्तगटही पाहावा. त्याची आर्थिक स्थिती, घरदार, सामाजिक वर्तन याबद्दल आग्रह धरावा व त्यानुसार अपेक्षापूर्ती होत नसेल तर जरूर स्थळ नाकारावे; परंतु निव्वळ ‘चौगले’ आडनाव आहे म्हणून स्थळ नाकारणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण मानले पाहिजे.सुशिक्षितच जास्त अडाणी..पूर्वीचे लोक ‘जाडे-भरडे बघा आणि सांभाळून घ्या,’ असे म्हणायचे परंतु आता शिकलेले लोकच जास्त अडाणी झाले असून ते कुळी, पदर, उच्च-नीचता याचा बाऊ करू लागले आहेत. त्यामुळे हा समाज पुढे निघाला आहे की मागे याचा विचार करण्याची गरज आहे.उलटे चित्र..लिंगायत-जैन समाजातही ‘चौगुले’ आडनावाचे लोक आहेत. लिंगायत समाजात हे आडनाव जास्त लोकांचे आहे; परंतु त्या समाजात ‘चौगुले’ आडनावाबाबत अशी भावना नाही. उलट त्या समाजात चौगुले यांना ‘पंचम’ म्हणजे उच्च कुळातील मानले जाते. आडनाव एकच परंतु दोन समाजात त्याबद्दल वेगवेगळी भावना आहे.